22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्र१६ नोव्हेंबरलाच दिला राजीनामा

१६ नोव्हेंबरलाच दिला राजीनामा

अहमदनगर : प्रतिनिधी
ओबीसीच्या मुद्यावरून मी भाषण करतो. त्यावरून विरोधी पक्षनेते राजीनामा मागतात. माझ्या सरकारमधील नेतेसुद्धा बोलतात. काल एक जण काहीतरी बडबला की, भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला मंत्रिमंडळच्या बाहेर काढा. १७ नोव्हेंबरला ओबीसीची पहिली रॅली अंबडला झाली. १६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाच राजीनामा देऊन सभेला गेलो. अडीच महिने मी शांत राहिलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून केला.

ओबीसी आरक्षण सुरक्षा लढा अंतर्गत आज अहमदनगर येथे महाएल्गार सभा झाली, त्यावेळी भुजबळ बोलत होते. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करायचा नाही, पण प्रश्न निर्माण झाले आहेत. तुम्ही २७ तारखेला मोर्चाला सामोरे गेला विरोध नाही. पण तुम्ही त्या मोर्चात मराठा समाजाला आरक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली पूर्ण केल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवरायांची शपथ पूर्ण झाली असेल तर मागासवर्गीय आयोग कशासाठी, असा थेट सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करत त्यांनाच आरोपांच्या पिंज-यात उभे केले.

फडणवीससाहेब तुमच्या खात्याचा भेदभाव अयोग्य
जिथे ओबीसी लोक राहतात. तिथे दहशत निर्माण केली जात आहे. मारहाण केली जात आहे. लोक गाव सोडून जात आहेत. न्हावी समाजाच्या दुकानात जायचे नाही असे ठरविले. सर्व नाभिक समाजाने ठरवा एकही मराठा समाजाची कटिंग करायची नाही. फडणवीस साहेब तुमच्या खात्याचा भेदभाव चांगला नाही. रात्री दोन-तीन वाजेपर्यंत सभा हे काय सुरू आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

खोटी वंशावळ जोडण्याचे प्रकार
३६० कोटी रुपये खोटे रेकॉर्ड तयार करण्यासाठी देण्यात आले का, अशी विचारणा भुजबळ यांनी केली. कुणबी जिथे म्हटले आहे त्या अक्षरात बदल आहे, त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही, असे मुख्याध्यापकचे पत्र आहे. कोणाशी लग्न केले तरी तुम्ही आरक्षण पात्र ठरणार नाही, असे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे. खोटी वंशावळ जोडण्याचे प्रकार सुरू आहेत, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR