22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रबकुळगंधकार कवी राजन लाखे यांची निवड

बकुळगंधकार कवी राजन लाखे यांची निवड

पुणे : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर मसापचे तिसरे प्रतिनिधी म्हणून बकुळगंधकार कवी राजन लाखे यांची बहुमताने निवड झाली. महाराष्ट्र साहित्य परिषद येथे झालेल्या कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी निवड जाहीर करून निवडीचे पत्र लाखे यांना दिले.

वास्तवरंग फुलताना, मी पाहिलेला सूर्य, सौंदर्याच्या गर्भातून, मनातले माझ्या, मन माझे मी मनाचा,गुंता, तसेच बालसाहित्य ढब्बू ढेरपोट्या,बकुळगंध आदी पुस्तके त्यांच्या ग्रंथसंपदेत असून ‘बकुळगंध’ या विविध वैशिष्ट्ये असलेल्या ग्रंथाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झाली आहे .

त्यांच्या नियमबद्ध कार्यक्षम पद्धतीमुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कवी कार्याला प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे. ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविकट्टा या व्यासपीठावरील १५०० कवितांपैकी लाखे यांनी संपादित केलेल्या निवडक ९६ कवितांचा संग्रह डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी प्रकाशित करून कवींचा सन्मान केला आहे.

साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर नेण्याची तर पिंपरी चिंचवडला साहित्यनगरी म्हणून ओळख देण्याची मोलाची कामगिरी तसेच र साहित्य क्षेत्रात केलेल्या विविध कार्याची दखल घेऊन लाखे यांची निवड झाली असून त्यावेळी मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार, विनोद कुलकर्णी, रवींद्र बेडकिहाळ, पद्माकर कुलकर्णी, कल्याण शिंदे, जे. जे कुलकर्णी, शिरीष चिटणीस, प्रमोद आडकर, रावसाहेब पवार उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR