24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रसमृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच; ३ ठार

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच; ३ ठार

मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून गुरुवारी पहाटे ५.३० च्या सुमारास समृद्धी महामार्गावर अमरावती, तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात झाला. खासगी बसला कंटेनरची धडक लागली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. खासगी बसचालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचे समजते. अपघातानंतर चालक पळून गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

ऋषी गौड (२०, रा. लितीपूर, ता. नवागड, छत्तीसगड) डगेश्वर गौड (२२, रा. पदमी, छत्तीसगड) व प्रकाश (बसमधील मदतनीस) यांचा समावेश आहे. त्­यांचे मृतदेह धामणगाव रेल्­वे येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. महेंद्र ट्रॅव्­हल्स कंपनीची सीजी १९/ एफ ०३८१ क्रमांकाची ही प्रवासी बस अहमदनगरहून रायपूरकडे जात होती. गुरुवारी पहाटे पाचच्­या सुमारास वाढोणा ते शिवणी दरम्यान या भरधाव बसने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. अपघातात तिघांचा घटनास्­थळीच मृत्­यू झाला.

महेंद्र ट्रॅव्हल्सची खासगी बस अहमदनगर येथून रायपूरला समृद्धी महामार्गाने जात होती. अमरावती येथील तळेगाव दशासर येथे पहाटे ५.३० च्या सुमारास ही खासगी बस एका कंटेनरवर धडकली. चॅनेल १२८ येथे हा अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाहनचालक पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान खासगी बसच्या चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. पण या अपघाताने समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR