25.7 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeराष्ट्रीयशहा यांना मूळ मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष वळवायचे : राहुल गांधी

शहा यांना मूळ मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष वळवायचे : राहुल गांधी

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेल्या टिप्पणीबाबत राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमित शहांनी ‘मूळ मुद्द्यांवरून लक्ष वळवल्याचा’ आरोप केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, त्यांना कदाचित इतिहास माहीत नाही आणि त्यांना मूळ मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष वळवायचे आहे. राहुल गांधी म्हणाले की, पंडित नेहरूंनी देशासाठी आपले प्राण दिले. ते वर्षानुवर्षे तुरुंगात राहिले. अमित शहाजींना कदाचित इतिहास माहित नसेल. संपूर्ण लक्ष वेधून घेण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे.

राहुल गांधी म्हणाले की, मूळ मुद्दा जातनिहाय जनगणनेचा आहे. मूळ मुद्दा हा या देशाची संपत्ती कोणाच्या हातात जात आहे, हा आहे. या लोकांना याबद्दल बोलायचे नाही. त्यांना याची भीती वाटते. गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत नेहरूंचा उल्लेख केला होता. जम्मू-काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयकावरील चर्चेदरम्यान अमित शाह यांनी नेहरूंवर ‘दोन मोठ्या चुका केल्या’चा आरोप केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR