22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयट्रक आणि रिक्षाची भीषण धडक; ९ ठार, ५ गंभीर

ट्रक आणि रिक्षाची भीषण धडक; ९ ठार, ५ गंभीर

पाटणा : ट्रक आणि रिक्षामध्ये झालेल्या जोरदार अपघातात तब्बल ९ प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील झुलौना येथे राष्ट्रीय महामार्ग ३० वर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर घटनास्थळावर स्थानिक नागरिकांसह प्रशासनाने तत्काळ बचावकार्याला सुरुवात केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लखीसराय- सिकंदरा महामार्गावर रिक्षामधून प्रवासी जात होते. यावेळी ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. हा अपघात रामगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या झुलौना गावाजवळ मध्यरात्री घडला. अपघात झाल्याची माहिती मिळताच रामगड पोलिस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळावर ८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर एका जणाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. रिक्षाचालक मनोज कुमार याचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

जखमींची प्रकृती नाजूक
लखीसराय जिल्ह्यातील महिसोना इथला मनोज कुमार हा रिक्षातून प्रवासी घेऊन जात होता. यावेळी हा भीषण अपघात झाला. ‘ट्रक आणि रिक्षाच्या अपघातात ९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जखमी प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. या पाच जखमींना पाटणा येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे,’ अशी माहिती डॉक्टर राजकुमार यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR