32.7 C
Latur
Thursday, February 20, 2025
Homeमहाराष्ट्रपालकमंत्रिपदाचा वाद उफाळला

पालकमंत्रिपदाचा वाद उफाळला

तटकरेंच्या वक्तव्याला शिरसाट यांनी दिले प्रत्युत्तर

मुंबई : प्रतिनिधी
रायगड आणि नाशिकचे पालकमंत्रिपद सध्या महायुतीसाठी कळीचा मुद्दा ठरला आहे. नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले होते तर रायगडचे पालकमंत्रिपद हे आदिती तटकरे यांना देण्यात आले. मात्र या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे नेते इच्छूक होते. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले तर नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी दादा भुसे हे इच्छूक होते. यावरून महायुतीत नाराजीनाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान आता पुन्हा एकदा पालकमंत्रिपदावरून सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांना टोला लगावला, तर संजय शिरसाट यांनी सुनील तटकरे यांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे महायुतीत आणखी वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी केली. निमित्त होते, मंत्री आदिती तटकरे आयोजित नामदार आदिती चषक क्रिकेट स्पर्धेचे. यावेळी त्यांनी पंचांनी दिलेला निर्णय अनेकांना मान्य नसतो, मग आरडाओरडा सुरू होतो. स्लो मोशनमध्ये कळते की आरडाओरडा करणा-यांपेक्षा निर्णय देणारा पंच योग्य असतो, अशी कोपरखळी शिवसेनेच्या भरत गोगावले यांना मारली.

तसेच अपील एका विशिष्ट मर्यादेपर्यंत करा, असा सल्लाही त्यांनी दिला. त्यावर आता शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले. जर पंचांचा निर्णय चुकला तर काय होऊ शकते हे आपण सर्वांनी अहिल्यानगरमध्ये पाहिले, असा टोला त्यांनी तटकरे यांना लगावला. त्यामुळे पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR