22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रभरधाव ट्रकने तिघांना चिरडले

भरधाव ट्रकने तिघांना चिरडले

सिग्नलवर थांबलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी पुण्यात पुन्हा मोठा अपघात

चंदननगर (पुणे) : कल्याणीनगर पोर्शे अपघातानंतर दुसरा मोठा अपघात खराडी जुना जकात नाका येथे घडला. नगर रस्त्यावर खराडी जकात नाका येथे भरधाव ट्रकने (एम एच १२ व्हीएफ ६४४१) दुचाकीवरील (एमएच १२ यूयू ६३७५) दोन महाविद्यालयीन तरूणांचा चिरडले. त्यात दोन महाविद्यालयीन आदिल शेख व अजुन एक (नाव नाही समजले) या तरुणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी रात्री दहाच्या दरम्यान घडला.

मृत तरूण हे वाघोली येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होते ते मुळचे उदगीर लातूर येथील आहेत. त्यातील एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जड मालवाहतूक करणारा ट्रक वाघोलीतून पुण्याकडे येत असताना खराडी जुना जकातनाका येथे अपघात घडला. याप्रकरणी ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. श्यामबाबू रामफळ गौतम असे चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक शामबाबू गौतम हा वाघोलीहून (एमएच १२ व्हीएफ ६४४१) घेऊन चंदननगरच्या दिशेने जात होता. जकात नाका येथे सिग्नलवर थांबलेल्या मोटरसायकला त्याने मागून जोरात धडक दिली. त्यामध्ये मोटरसायकलवरील असणारे ३ जण फरफटत गेली. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR