23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रभाजप सरकार उखडून फेका

भाजप सरकार उखडून फेका

मुंबई : महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. कर्नाटकतील भाजपा सरकार ४० टक्के कमीशनवाले होते महायुती सरकार तर त्यापुढे गेले आहे, भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रमच या सरकारने रचले आहेत. महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्ज लादून महागाई वाढवली आहे, महाराष्ट्र हे सर्वांत महागडे राज्य अशी ओळख निर्माण झाली आहे. महायुती सरकार गुजरातधार्जिणे असून गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग आणायचे व राज्यातले उद्योग गुजरातला पाठवायचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीसमोर व गुजरात लॉबीसमोर झुकणारे भाजपा युती सरकार उखडून फेका असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

उत्तर महाराष्ट्र विभागातील नंदरूबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील आढावा बैठक नंदूरबारमध्ये पार पडली या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्यध्यक्ष आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री के. सी. पाडवी, खासदार गोवाल पाडवी, खासदार शोभा बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, आ. शिरीष नाईक, आमदार शिरीष चौधरी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, बदलापूरमध्ये ३ वर्षांच्या दोन मुलींवर एका नराधमाने अत्याचार केल्यामुळे जनतेत तीव्र संताप आहे. सरकार कारवाई करत नसल्याने हजारो लोक रस्त्यावर उतरले पण महायुती सरकारला यात राजकारण दिसत आहे. ज्या शाळेत ही घटना घडली ती शाळा भाजपाशी संबंधित आहे, त्या शाळेला वाचवण्याचा प्रयत्न झाला. शाळेने सीसीटीव्ही फुटेज गायब केले, १२ तारखेला ही घटना घडली आणि १५ तारखेला मुख्यमंत्री बदलापुरात होते त्यांनी त्या घटनेकडे लक्ष दिले नाही. पीडित मुलीच्या गर्भवती आईला १२ तास पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवले. सामाजिक संस्थांच्या आणि नागरिकांच्या दबावामुळे गुन्हा दाखल करावा लागला. बदलापूर, अकोला, लातूर, नागपूरमध्येही असेच प्रकार घडले त्यामुळे संतप्त महिलांनी १५०० रुपये नको, मुलींना संरक्षण द्या, अशी मागणी केली, यात राजकारण कसे दिसते, असा सवाल पटोले यांनी केला.

बदलापूरच्या वरिष्ठ पीआय महिला असतानाही त्यांनी पीडित मुलीच्या आईला १२ तास पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवले, त्यांच्यावर सरकारचा दबाव होता हे स्पष्ट आहे. सरकार आपले पाप लवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या आयपीएस अधिका-याची एसआयटी नेमली त्यांची कामगिरी संशयास्पद आहे आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे तर भाजपाचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे या दोघांना बदलावे अशी आमची मागणी आहे असे पटोले म्हणाले.

केंद्रीय बोर्ड किंवा यूपीएससीच्या परीक्षा असताना राज्य आयोग परीक्षा ठेवत नाही पण यावेळी त्या एकत्र ठेवल्या असल्याने एमपीएससीच्या परीक्षांची तारीख बदलावी तसेच कृषी संवर्गाच्या २५८ जागांचे नोटीफिकेशन काढावे यासाठी पुण्यात विद्यार्थी दोन दिवसांपासून आंदोलन करत आहेत पण एमपीएससी विद्यार्थ्यांचे ऐकत नाही. आयोगातील अधिकारी मग्रुर आहेत, विद्यार्थ्यांच्या भवितव्यशी ते खेळत आहेत. ग्रामीण भागातील लाखो गरिब विद्यार्थी अधिकारी होऊ पहात आहेत पण त्यांच्या स्वप्नावर एमपीएससी पाणी फेरत आहे. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विचार करण्याची विनंती केली असे नाना पटोले म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR