25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रजरांगेंना असे बोलायला लावणे, हे पाप कुणाचे?

जरांगेंना असे बोलायला लावणे, हे पाप कुणाचे?

वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

मुंबई : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. जरांगे हे भाजप नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय. ते म्हणाले, मनोज जरांगे यांना असे बोलायला लावणे हे पाप कुणाचे आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही, मात्र ज्या पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल जरांगे बोलत आहेत, त्यांनी अशी भाषा वापरू नये असा सल्लाही वडेट्टीवारांनी मनोज जरांगेंना यावेळी दिलाय.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत बोलताना, ही काही मॅच फिक्सिंग आहे का? जरांगे पाटील यांनी एक पाउल पुढे टाकले ते पुढे असावे. तसेच ज्या पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल ते बोलत आहेत त्यांनी अशी भाषा वापरू नये. सत्ताधारी आणि जरांगे यांच्यामध्ये काय चर्चा झाली हा त्यांच्यातला प्रश्न आहे. तर जरांगे यांना असे बोलायला लावणं हे पाप कुणाचे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. चर्चेसाठी भाजपचेच लोक जात होते. तुम्ही जे पेराल ते उगवते. विश्वास कुणावर ठेवायचा, अशी माणसे फोडून अनेक बंड झालेत, असं वडेट्टीवारांनी म्हटलंय.

तेव्हा आम्ही चिंधड्या उडवू
आजपासून राज्य विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. यावर वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, हे अधिवेशन अंतरिम अधिवेशन आहे. प्रश्न उत्तर नाहीत तर लक्षवेधी तरी ठेवा, उद्या आम्ही स्थगन मांडू. विरोधकांचा प्रस्ताव येईल तेव्हा आम्ही चिंधड्या उडवू. सर्व पाप तुम्ही करायचे आणि आरोप मात्र विरोधकांवर करत टीका करायची असं ते म्हणालेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR