28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरउष्माघात झाल्यास तत्काळ उपचारासाठी स्वतंत्र सोय 

उष्माघात झाल्यास तत्काळ उपचारासाठी स्वतंत्र सोय 

लातूर : प्रतीनिधी
राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. विदर्भात तर काही ठिकाणी तापमान ४७ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले आहे. लातूरच्याही तापमानाचा पारा ३९ अंशसेल्सिअसपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अशा वाढत्या तापमानात उष्माघाताची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून येथील विलासराव देशमुख शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय लातूर येथे कोल्ड रुम तयार करण्यात आली आहे. उष्माघात झाल्यात रुग्णाला तत्काळ उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.  सामान्य रुग्णालयातील या कोल्ड रुममध्ये कुलर्स लावण्यात आले आहेत. रुमचं वातावरण थंड राहण्यासाठी आवश््यक उपाययोजना केल्या आहेत. उष्माघाताची लक्षणं आढळणा-या रुग्णांच्या तपासणीसह उपचारही केले जातात. उष्माघाताच्या रुग्णांकरिता आवश््यक औषधेदेखील ठेवण्यात आली आहेत.
सध्या लातूर जिल्ह्याचे तापमाण ४० डिग्री सेल्सिअसवर पोहोचले आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ होण्याची शक्यता संभावता आहे. त्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून जिल्हा रुग्णालयात कोल्ड रुम तयार करण्यात आल्याची माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. सचिन जाधव यांनी दिली आहे. तसेच नागरीकांना वाढत्या तापमानाचा  फटका वयोवृद्ध नागरिक, लहान मुले, रुग्ण यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेण्याचं आवाहनही जाधव यांनी एकमतशी बोलताना केले आहे.
वाढत्या उष्णतेच्या काळात नागरीकांनी आरोग्याकडे लक्ष द्यावची आवश््यक आहे. त्याबरोबर उपाययोजना करावे. सकाळ पासून ते  दिवस मावळेपर्यंत लागणारे उन आता वाढले आहे. त्यामुळे दुपारी बाहेर जाणे टाळावे, उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृद्ध व लहान मुले, गरोदर महिला, स्थूल लोक, पुरेशी झोप न झालेले लोक, मधुमेही, हृदयविकार, दारूचे व्यसन असणारे, घट्ट कपडे घातलेले, घरदार नसलेले, कारखान्यात बॉयलरजवळ काम करणे अशा प्रत्यक्ष उष्णतेशी संबंधित नागरिकांना उष्माघात होण्याची दाट शक्यता असते. तसेच शेतक-यांनी शेतातील कामे दुपारच्या काळात करणे टाळावे.  या अतिजोखमीच्या लोकांनी उष्णतेच्या लाटेसंदर्भात विशेष काळजी घेतली पाहिजे. उष्णतेमुळे होणारा शारीरिक त्रास किरकोळ किंवा  गंभीर स्वरूपाचा असतो. त्यामुळे नागरीकांना एप्रिल ते जून या  कालावधीत आपल्या शरीराची काळजा घ्यावी.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR