30.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रएक दिवस उद्धव ठाकरे देश सोडतील

एक दिवस उद्धव ठाकरे देश सोडतील

रामदास कदम

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट तयार झाले. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. आता त्यांनी उद्धव ठाकरे यांचे भविष्य सांगितले आहे.

रामदास कदम म्हणाले, ‘एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे रात्री दोन वाजता आपल्या कुटुंबाला घेऊन देश सोडून जातील’, असे माझे शब्द आहेत. तुमच्याकडे लिहून ठेवा. बाळासाहेब यांच्याशी त्यांनी जी बेइमानी केली. शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी जे पाप केले, त्या पापाचे प्रायश्चित्त उद्धव ठाकरेंना भोगावेच लागेल, असा जोरदार हल्ला रामदास कदम यांनी केला.

महाविकास आघाडीकडून पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले जात आहे. त्याबद्दल बोलताना रामदास कदम म्हणाले, लोकसभेत त्यांना जास्त जागा मिळाल्या. जास्त खासदार निवडून आले. तेव्हा त्यांनी ईव्हीएम मशिनवर कुठे खापर फोडले का? नाही ना. मग आता विधानसभेत महायुतीच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे त्यांना कारण हवे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR