मुंबई : प्रतिनिधी
काश्मीर खो-यातील पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत गोळ्या घातल्या. यामध्ये एकूण २८ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील अनेक पर्यटक सध्या काश्मीरला फिरायला गेले असून या हल्ल्यानंतर शेकडो लोक तिथे अडकले आहेत.
काश्मिरात अडकलेल्या महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील १०० पर्यटकांना घेऊन आज मुंबईत येईल. या विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडली आहे.
दरम्यान, काश्मीरमधील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील १०० पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. त्या १०० पर्यटकांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत ही माहिती देण्यात आली आहे.
कालही सरकारने जम्मू-काश्मीरमधून महाराष्ट्रात परत आणल्या जाणा-या ८३ पर्यटकांची यादी जाहीर केली होती. त्यामुळे आता एकूण २ विशेष विमानांनी महाराष्ट्रातील १८३ पर्यटक राज्यात परत येऊन आपापल्या घरी सुखरूप पोहोचतील.
एअर इंडियाच्या विशेष विमानाची सोय
मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात वरील अधिकृत अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करून माहिती देण्यात आली आहे. आज २ विशेष विमाने मुंबईत येणार आहेत. इंडिगोचे विमान ८३ पर्यटकांना परत आणेल, तर एअर इंडियाच्या विमानाने १००, असे महाराष्ट्रातील एकूण १८३ पर्यटक आज मुंबईत परततील. ही दोन्ही विमाने सायंकाळच्या सुमारास मुंबईत येणार आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत. या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार करणार आहे.