जळगाव : यंदा पाऊस कमी झाल्याने जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात काही गावांत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्याचा तर, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे.
यामुळे या परिसरात असलेला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने त्वरित उपाययोजना करण्यात याव्या, या मागणीसाठी चिंच गव्हाण, कळवडी, धामणगाव, खेडगाव परिसरातील शेतक-यांनी चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर गिरणा धरण फाट्यावर रस्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.