24.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्र‘तहात’ जिंकण्याचा प्रयत्न ; भाजपाचा पलटवार

‘तहात’ जिंकण्याचा प्रयत्न ; भाजपाचा पलटवार

मुंबई : प्रतिनिधी
वीस वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी भाषेसाठी एकाच मंचावर एकत्र आले. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. यानंतर आता भाजपाने यावर पलटवार केला आहे. भाषेचे प्रेम वगैरे काही नव्हतेच… निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब ‘तहात’ जिंकण्याचा प्रयत्न! असे म्हणत निशाणा साधला आहे.

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केले आहे. ‘भाषेसाठी नाही ही तर.. निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी! महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता ‘भाऊबंदकी’ आठवली… ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेहमिलनाचा कार्यक्रम होता.

भाषेचे प्रेम वगैरे काही नव्हतेच… आणि ते यांच्या लेखी नाहीच! महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लुटमार… त्यासाठी सत्ता.. यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे. श्रीमान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे… निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब ‘तहात’ जिंकण्याचा प्रयत्न! असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

‘म मराठीचा नाहीच’ सत्तेचाच. गेले अनेक दिवस दोन भाऊ एकत्र येणार म्हणून सुरू असलेला अंक एकदाचा आज उघडला आणि या दोघांकडून अपेक्षा असणा-याच्या मनांत निराशाच आली कारण मराठी, मराठी भाषा याबद्दल काय होतं या कार्यक्रमात?

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR