राज्यात अवकाळी पावसाचे संकट

पुणे : प्रतिनिधी
राज्यात सध्या हवामानाचा विचित्र खेळ सुरू असून नागरिकांसह शेतकरीही मोठ्या चिंतेत सापडले आहेत. एका बाजूला कडक उन्हामुळे तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे पोहोचला आहे, तर दुस-या बाजूला अवकाळी पावसाने अनेक भागांना अक्षरश: झोडपून काढले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत हवामान बदलताना दिसत आहे. एप्रिल महिन्यापासूनच अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला, तर काही भागात उष्णतेने कहर केला. कोकणात दमट आणि उकाड्याचे वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस आणि वेगवान वा-यांचा इशारा देण्यात आला आहे. या बदलत्या वातावरणामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतक-यांच्या अडचणीतही मोठी भर पडली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. जळगाव येथे राज्यातील सर्वाधिक ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अकोला आणि मालेगावमध्येही तापमान ४२ अंशांच्या घरात पोहोचले आहे. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात काही दिवस तापमानात घट झाली होती, मात्र पुन्हा उष्णतेची लाट वाढली आहे. वाढत्या उकाड्यामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना त्रास सहन करावा लागत असून उष्माघाताचा धोका वाढल्याची चिंता व्यक्त होत आहे.

पुढील काही दिवस उष्णतेची तीव्र लाट
हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी बाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. उष्णतेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतीपिकांवर परिणाम होत असल्याने ग्रामीण भागात चिंता अधिक वाढली आहे.

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|'ही कर्जमाफी नाही, कर्जवसुली योजना!' – रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
10:08
Video thumbnail
Karmala|खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
00:53
Video thumbnail
BREAKING : लातूर जिल्ह्यासाठी ४८४ कोटींचा विकास आराखडा मंजूर;DPDC बैठकीत महत्त्वाचे निर्णय
06:19
Video thumbnail
Latur|दोन दिवसांच्या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत; पण कृषी विभागाचा मोठा इशारा!
02:54
Video thumbnail
BREAKING| ड्रेनेजच्या नावाखाली खोदलेले रस्ते ठरले जीवघेणे!; नारायण नगरात अपघातांचा धोका वाढला
05:30
Video thumbnail
कायदा-सुव्यवस्थेलाच खुलेआम आव्हान...किल्लारीत पोलिसांनाच जिवे मारण्याची धमकी‌ #breakingnews #marathi
00:39
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
09:27
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
00:00
Video thumbnail
BREAKING : जळकोट तालुक्यात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत लाखोंचा घोटाळा उघड
01:03
Video thumbnail
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला साडी-चोळी आणि बांगड्या; तुळजापुरात संतप्त महिलांकडून अनोखा निषेध
02:30
Video thumbnail
पालखी मार्ग, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा वेळेत पूर्ण करा; जि प सभेत विविध विभागांना समन्वयाचे आदेश
07:01
Video thumbnail
Rohit Pawar|लातुरातून रोहित पवारांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
07:29
Video thumbnail
Parbhani|परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक आग; BLO बैठकीत उडाली धावपळ
02:56
Video thumbnail
BREAKING : लातूर शहरासह जिल्हाभरात पावसाची दमदार सुरुवात
02:07
Video thumbnail
Latur|मुरुडला नगरपंचायत दर्जा द्या; माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी
05:03

Latest news