रेणापूर : प्रतिनिधी
शेतक-यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीचे निवेदन रेणापूर तालुका व शहर कॉग्रेसच्या वतीने तहसिलदार यांना बुधवारी दि २५ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. सध्याचे केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी असून झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशावरून व प्रातांध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून माजी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख , माजी मंत्री दिलीपराव देशमुख व लातूर ग्रामीणचे आ. धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रेणापूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रेणापूर तालुक्यातील शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीचे निवेदन देऊन कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, लातूर ग्रामीणचे निरिक्षक अनुप शेळके, तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, रेणापूर कृउबा समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती अॅड. शेषेराव हाके, शहर उपाध्यक्ष उमेश सोमानी, माजी जि. प. सदस्य अशोक पाटील, रेणाचे संचालक धनराज देशमुख, संग्राम माटेकर, स्रेहल देशमुख, सौ पुजा इगे, सेवादल कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश सुर्यवंशी, कृउबाचे संचालक सुशिलकुमार पाटील, जनार्धन माने, कमलाकर आकनगिरे ,बाळकृष्ण खटाळ, राजाभाऊ साळुंके, पद्म पाटील, प्रभाकर केंद्रे, पंडीतराव माने, सेवादल कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष हनमंतराव पवार, अजय चक्रे, भुषण पनुरे, रामंिलंग जोगदंड, अनिल पवार, पाशामियाँ शेख, बाळासाहेब करमुडे, गोंिवंद देशमुख, महादेव बरीदे, प्रदिप काळे, सचिन इगे, पप्पू सिरसकर, तानाजी सूर्यवंशी, रहिम पठाण, बिभीषण कदम, रोहित पवार, राजेसाहेब खाडप , रमेश राठोड , विलास राठोड आदींच्या स्वाक्ष-या आहेत.