लातूर : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य लढ्यापासून ते आजपर्यंत देशासाठी मोठे योगदान दिलेले आहे. काँग्रेसने देशातील सर्वसामान्यांना केंद्रबिंद माणुन देशाचा विकास केला आहे. काँग्रेसने कधीच जातीपातीचे राजकारण केले नसल्यामुळेच सामान्यांचा विश्वास म्हणजेच काँग्रेस होय, असे मत अल्पसंख्यांक काँग्रेसचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अॅड. फारुक शेख यांनी व्यक्त केले.
लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ अॅड. फारुक शेख यांनी लातूर तालुक्यातील महमदापूर येथील मतदारांच्या भेटीगाठी घेत जनसामान्यांना काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा सांगीतला. उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना मतदान करण्याबाबत विनंती केली. गेल्या दहा वर्षांमध्ये केंद्र सरकारने ज्याप्रमाणे सामान्य नागरिकांचा विश्वास घात केला आता त्यांना माफी नाही म्हणून या वेळी काँग्रेस पक्षाला व सहकारी पक्षाला केंद्रामध्ये सरकार बनविण्याची संधी द्यावी,
काँग्रेस पक्षाचा महत्त्वाचा अजंडा म्हणजे सर्वसामान्यांचा विश्वास यासाठी राहुल गांधी यांनी त्यांच्या जाहीरनामामध्ये सामान्य लोकांसाठी अनेक प्रकारचे फायदेशीर योजना घेऊन आल्याचेही उल्लेख या वेळी केला. या वेळी मैनोद्दिन शेख, अमीर शेख, असलम शेख, हुसेनभाई शेख, रोहित वडले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.