33.3 C
Latur
Tuesday, June 3, 2025
Homeलातूरअवकाळी पावसाचा महावितरणला मोठा फटका 

अवकाळी पावसाचा महावितरणला मोठा फटका 

लातूर : प्रतिनिधी
गेल्या २२ दिवसांपासून लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला आहे. या पावसाने शेतीचे विशेषत: फळबाग, भाजीपाल्याचे मोठे नूकसान झाले. तसेच महावितरणलाही या अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका असला आहे. लातूर, निलंगा आणि उदगीर या तीन विभागातील उच्चदाब वीजवाहिन्या व लघूदाब वीजवाहिन्यांचे तब्बल १ हजार ३६८ विद्यूत खांब जमीनदोस्त झाले आहेत.
लातूर जिल्ह्यात ९ मे पासून कमी-अधिक प्रमाणात बेमोसमी पाऊस पडत आहे. दि. २७ मे रोजी संपुर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. एकाच दिवसांत ९६ मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. या पावसाने सर्वत्र हाहाकार उडवून दिला. शेतीचे मोठे नूकसान झाले. सखल वस्त्यांतील घरात पाणी शिरुन अनेकांचे गृहोपयोगी वस्तू भिजून नुकसान झाले. अनेकांना रात्र जागुन काढावी लागली. नदी, नाले वाहिले, गटारी तुूंबल्या, घाण पाणी रस्त्यांवर आले होते. या पावसाचा महावितरणलाही जबरदस्त फटका असला आहे.
बेमोसमी पावसाने महावितरणच्या लातूर विभागातील उच्चदाबाचे विद्यूत खांब १८४ पडले, वाकले, लघुदाबाचे २८८ विद्यूत खांब पडले/ वाकले, उच्चदाब वीजवाहिनीच्या ४.८ कि. मी. तारा तुटल्या, लघुदाब वीजवाहिनीच्या तारा ५.५२ कि. मी. तुटल्या तर ९ रोहीत्र (डीपी) कोसळले.  निलंगा विभागात उच्चदाबाचे १८७ विद्यूत खांब पडले/ वाकले, लघुदाबाचे २८८ विद्यूत खांब पडले/ वाकले, उच्चदाब वीजवाहिनीच्या तारा ६.५५ कि. मी. तुटल्या, लघुदाब वीजवाहिनीच्या तारा १२.१८  किमी तुटल्या, २४ रोहीत्र (डीपी) कोसळले. उदगीर विभागातील उच्चदाबाचे  १७१ विद्युत खांब पडले/ वाकले, लघुदाबाचे  २५० विद्युत खांब पडले/ वाकले,
 उच्चदाब वीजवाहिनीच्या तारा ६.४९ किमी तुटल्या, लघुदाब वीजवाहिनीच्या तारा ३०.६२ किमी तुटल्या तर ४ रोहीत्र (डीपी) कोसळले. महावितरणने युध्दपातळीवर भर पावसात अहोरात्र काम करत ९० टक्के वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्या यश मिळवले आहे. पडलेले विजेचे पोल उभे करणे, तारा जोडणी रोहीत्र दुरुस्त करणे, बदल करण्याचे काम युध्दपातळीवर करण्यात आले आहे. चिखलामुळे अथवा झाडे तुटून पडल्यामुळे बाधीत काही भागाचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यास २४ ते ४८ तास लागले. मात्र महावितरणच्या यौद्धांनी अहोरात्र काम करत वीजपुरवठा पुर्ववत केला आहे. जिथे शक्य आहे तिथे त्वरीत दुरूस्ती केली आहे. मान्सूनपुर्व करावयाची कामेही पुर्णत्वास येत असून  ८०-८५ टक्क्याच्यावर काम झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR