27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्र‘उखाड के फेक देंगे’

‘उखाड के फेक देंगे’

 बच्चू कडू आक्रमक, राणांविरोधात हल्लाबोल

अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघातून आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी प्रहार पक्षाकडून भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी बच्चू कडू यांनी आपल्या भाषणात आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर घणाघात केला. ‘हम डरते नहीं. डराने वालों को हम डराते है. तानाशाही नहीं चलेगी. उखाड के फेक देंगे’असा हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला.

दरम्यान, कडू म्हणाले, जेव्हा निकाल हाती येईल तेव्हा देशातील नेते पहात राहतील. तुम्ही हळदी-कुंकू घेता. इकडे फिनल मिलचा कामगार आत्महत्या करत आहे. आमचा प्रहार पक्ष स्वतंत्र आहे. आम्ही सर्वसामान्य माणसाचे गुलाम आहोत. काल एक चिठ्ठी आली- जास्त बोलाल तर जेलमध्ये जाल. बच्चू कडू कार्यकर्त्यांची अवलाद आहे. दुपट्टा घातला आणि नेता झाला अशी परिस्थिती नाही. जेलमध्ये टाकलं तरी जेलमधून आवाज काढणार. रामदेव बाबाने उद्योग सुरू केले. बचत गटाचे काय? मोदी म्हणायचे अच्छे दिन आएंगे. हे आहेत का अच्छे दिन? १७ रुपयांच्या फाटक्या साड्या वाटल्या. हेच का अच्छे दिन?’’, असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

निवडणुकीमध्ये मेळघाटमध्ये साड्या वाटता. तिथे पाण्याची गरज आहे. रोजगाराची गरज आहे. गोडाऊनमध्ये पडलेल्या साड्या वाटल्या आहेत. या जिल्ह्याची जर कोणी प्रतिमा खराब करत असेल तर आईची शपथ आम्ही सोडणार नाही. जातप्रमाणपत्रात सांगितले आहे की, हा गुन्हा आहे. पण अजून निकाल नाही. म्हणून राणा आता जनतेच्या न्यायालयात आहे असे बच्चू कडू म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR