लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर आणि परिसरातील गावांमध्ये मान्सूनपूर्व अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होते. शहराच्या सखल भागांमध्ये आणि गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, गावात, शेतात आणि रस्त्यांवरुन पाण्याचे लोंढे वाहत होते. अनेक खोलगट भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी तातडीने जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि महापालिका यंत्रणेला नागरिकांची काळजी घेण्याचे निर्देश दिले होते. तसेच, त्यांनी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपापल्या परिसरातील नागरिकांना मदत करण्यासाठी पुढे येण्याचे कळकळीचे आवाहन केले होते. त्यानूसार काँग्रेसचे पदाधिकारी, प्रशासन लातूरकरांची मदत करीत
आहेत.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, माजी आमदार तथा विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, विलास को-ऑप. बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, ट्वेन्टी-वन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, प्रविण सुर्यवंशी यांनी तात्काळ त्या गावी जाऊन पाहणी केली. दि. ३० मे रोजी सकाळी खाडगाव येथे जाऊन पडझड झालेल्या घरांची त्यांनी पाहणी केली, कासारगाव येथे पूलाची आणि नाल्याची पाहणी केली तर महापूर गावात जाऊन पडझड झालेल्या घरांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी खाडगाव येथे सरपंच नेताजी देशमुख, ग्रामसेवक उत्तम गोमसाळे, देवानंद जाधव, शरद देशमुख, दौलत देशमुख, अनंत देशमुख, आयुब मुजावर, पांडुरंग पाटील, बालासाहेब देशमुख, गोपाळ साठे, अर्जुन सगर, अल्का मगर, यशवंच मोटे, आबा मगर, कासारगाव येथे चेअरमन गोपाळ भंडे, उपसरपंच जयदेव मोहिते, नंदकिशोर मोहिते, सरपंच बगाडे, तंटामुक्ती अध्यक्ष राजू मोहिते, ग्रामपंचायत सदस्य पृथ्वीराज मोहिते, संभा कांबळे, सचिन मोहिते, गोविंद शिंदे, अमर मोहिते तर महापूर येथे सरपंच संदीप माने, पंडीत ढमाले, अनंत माने, लक्ष्मण भोसले, हुसेन सय्यद, मुक्ताराम भादगे, आदी उपस्थित होते.