चंद्रपूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील कोरधा येथे एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघाताची घटना घडली आहे. गणपतीचे दर्शन घेऊन आनंदाने घरी परतणा-या कुटुंबाच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका १३ वर्षांच्या बालिकेसह दोघांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेदरे आणि भर्रे कुटुंबीय चंद्रपूरहून गणपतीपुढील देखावे व दर्शन घेऊन ब्रह्मपुरीच्या दिशेने परत जात होते. नागभीड जवळील कोरधा येथे चालकाने कार रस्त्याच्या बाजूला उभी करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी मागून आलेल्या एका भरधाव ट्रकने कारला अत्यंत जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा चुराडा झाला.
या अपघातात श्रावणी हिमेश बेदरे आणि नीतीन भर्रे यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे बेदरे आणि भर्रे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अपघातात दोन जण गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर कारमधील इतर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य राबवले. पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास करत आहेत.
दक्षिण मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास एक अत्यंत थरकाप उडवणारा आणि भीषण अपघात घडला. गुजरातहून मुंबईत उच्च शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कोस्टल रोडच्या पुलावरून थेट ५० फूट खाली कोसळली. या दुर्दैवी घटनेत तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.















