25.6 C
Latur
Friday, August 1, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात लाखो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

राज्यात लाखो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

८३ हजार ९४४ विद्यार्थ्यांना प्रवेश; ५ लाख ४३ हजार ५१६ विद्यार्थ्यांना पुढील फेरीची वाट

मुंबई : प्रतिनिधी
कमी गुण असूनही अनेकांनी नामवंत महविद्यालये निवडल्याने तसेच पसंतीक्रमाच्या घोळामुळे अकरावी प्रवेशात अनेकांना चौथ्या यादीतही प्रवेश मिळालेला नाही. अजूनही राज्यातील तसेच महामुंबईतील हजारो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. राज्यात लाखो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत असूनही केवळ ८३ हजार ९४४ विद्यार्थांना प्रवेश मिळाला आहे. तर मुंबईतील केवळ १८ हजार ४७४ विद्यार्थ्यांचा या यादीत समावेश आहे. यामुळे ५ लाख ४३ हजार५१६ विद्यार्थ्यांना आता पुढील फेरीची वाट पहावी लागणार आहे.

राज्यभरातून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी १४ लाख २९ हजार २३४ विद्यार्थ्यांनी केलेली आहे. प्रवेशाच्या नियमित फेरी एक व दोन मध्ये ७ लाख २० हजार ६६६ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित केला आहे. तर नियमित तिसर्या फेरीत १ लाख ११ हजार २३५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. यापैकी ९३ हजार ६१ विद्यार्थांनी महाविद्यालयात प्रवेश घेतले. त्यानुसार तिर्स­या यादी अखेर राज्यात ८ लाख १३ हजार ७२७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

बुधवारी सायंकाळी जाहीर झालेल्या चौथ्या फेरीमध्ये राज्यात ८३ हजार ९४४ विद्यार्थांना प्रवेश देण्यात आले आहेत. या यादीतही नामवंत महाविद्यालयांच्या प्रत्येक शाखेच्या कट-ऑफमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. ८० ते ७० टक्के व त्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या महाविद्यालयाच्या पसंतीक्रमाचा पुनर्विचार करावा लागणार आहे. तिर्स­या यादीत एचआर महाविद्यालयात वाणिज्य शाखेचा कट-ऑफ ९८टक्क्यांवर गेला होता. विल्सन महाविद्यालयात तिर्स­या यादीत कला शाखेसाठी ७१ टक्के मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता.

चौथ्या यादीत हा टक्का ७१.४ वर गेला आहे. रुपारेल महाविद्यालयात कला शाखेसाठी तिर्स­या यादीत८४.४टक्के मिळवलेल्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला. पण चौथ्या यादीचा कट-ऑफ ८५.२ टक्क्यांवर गेला आहे. कमी टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना आता त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमाबाबत विचार करावा लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय अलॉट झाले आहे, २ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR