25 C
Latur
Thursday, June 26, 2025
Homeमहाराष्ट्र‘शक्तिपीठ’चे १० हजार कोटी निवडणुकीसाठी वापरले जातील

‘शक्तिपीठ’चे १० हजार कोटी निवडणुकीसाठी वापरले जातील

मुंबई : प्रतिनिधी
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी तब्बल २० हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या शक्तिपीठ महामार्गावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘महाराष्ट्राची अवस्था खूपच कठीण आहे. सध्या महाराष्ट्राची लूट सुरू आहे’, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

संजय राऊत यांनी शक्तिपीठ महामार्गावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, ‘यावेळी त्यांनी महाराष्ट्राची खूपच कठीण अवस्था केली आहे. सध्या महाराष्ट्राची लूट सुरू आहे. या शक्तीपीठ महामार्गासाठी २० हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या पैशातील १० हजार कोटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरले जातील.’

संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, ‘राज्यात हे सर्व ड्रीम प्रोजेक्ट ठेकेदारांकडून हजारो कोटी काढण्यासाठी चालले आहे. महाराष्ट्राला याचा किती फायदा होईल की नाही हा पुढचा प्रश्न. सर्वांत आधी आपले खिसे भरा, आपल्या बॅगा भरा आणि त्या पैशातून महाराष्ट्राच्या राजकारणाला ब्लॅक मनीतून खरेदी-विक्री सुरू करा. समृद्धी महामार्गाबाबत फक्त ठेकेदाराला दोषी धरून चालणार नाही. या प्रकरणी संबंधित मंत्र्याला ताबडतोब मंत्रिमंडळातून काढायला पाहिजे.’

तसेच, आता ठेकेदारांनी त्यांना मोट कमिशन दाखवले असेल. ही कमिशन पाहिजे आहे. ५०० कोटी माळेगाव साखर कारखान्याला देणार आहेत. कुठून आणणार आहात.. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री २० दिवस गावात बसतात. काय चाललं आहे या राज्यात. फार कठीण अवस्था आहे. महाराष्ट्राची लूट चालली आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR