सोयाबीन बियाणे उगवलेच नाही; राज्यात २४ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

मुंबई : प्रतिनिधी
खरीप हंगामात सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळे राज्यातील २४ हजार ६६७.५४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. याप्रकरणी राज्यभरातून १७ हजार ४७३ तक्रारी प्राप्त झाल्या असून, संबंधित बियाणे कंपन्यांविरुद्ध आतापर्यंत ८५ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी (दि. २९) पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘‘राज्यात यंदा सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ४७.२१ लाख हेक्टर असून २७ जुलैअखेर सुमारे ४५.१० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. हंगामासाठी सोयाबीन बियाणांची गरज १३.१२५ लाख क्विंटल असताना राज्यात एकूण १८.५७ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले होते. पुरेसा बियाणे साठा असतानाही काही कंपन्यांच्या बियाणांची उगवण न झाल्याने शेतक-यांना दुबार पेरणीचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.

अकोला, अमरावती, बुलडाणा आणि यवतमाळमधून सर्वाधिक तक्रारी
सोयाबीन बियाणांच्या उगवण क्षमतेबाबत राज्यात प्राप्त झालेल्या तक्रारींची संख्या १७ हजार ४७३ आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अकोला, अमरावती, बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील तक्रारींचा समावेश आहे. प्राप्त तक्रारींपैकी तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांनी १० हजार १३५ प्रकरणांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तपासणीसाठी सोयाबीन बियाणांचे ७ हजार ८९१ नमुने घेण्यात आले. प्रयोगशाळांच्या अहवालानुसार त्यापैकी १ हजार ८२ नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आले आहेत.

अप्रमाणित बियाणांच्या प्रकरणात संबंधित कंपन्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. अहवालात तक्रारी प्राप्त झालेल्या प्रमुख कंपन्यांमध्ये बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रा.लि., रवी हायब्रीड सीड्स अँड रिसर्च, यशोदा आणि पार्श्व जेनेटिक्स एलएलपी आदींचा समावेश आहे.

खतांची कमतरता नाही; २०.७३ लाख टन साठा शिल्लक
राज्यात खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले. खरीप २०२६ साठी ५०.५० लाख टन खतांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ४८.८० लाख टन नियोजनाला मंजुरी मिळाली. प्रत्यक्षात हंगामासाठी ५०.८० लाख टन खतांची उपलब्धता झाली आहे. राज्यात २७ जुलैपर्यंत ३०.०९ लाख टन खतांची विक्री झाली असून, सध्या २०.७३ लाख टन खतसाठा उपलब्ध आहे.

राज्यात खरिपाची पेरणी ८४ टक्क्यांवर
राज्यात खरीप पिकांचे पाच वर्षांचे सरासरी क्षेत्र १४४.३६ लाख हेक्टर आहे. २९ जुलैअखेर राज्यात १२०.८४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, हे प्रमाण सरासरी क्षेत्राच्या ८४ टक्के आहे. गतवर्षी २९ जुलै २०२५ पर्यंत १३२.७७ लाख हेक्टर, म्हणजे सरासरीच्या ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्या तुलनेत यंदा पेरणीचे क्षेत्र ११.९३ लाख हेक्टरने कमी आहे. गतवर्षीची अंतिम खरीप पेरणी १४३.५५ लाख हेक्टर होती.

अमरावती आघाडीवर, ठाणे पिछाडीवर
राज्यात सर्वाधिक पेरणी अमरावती विभागात झाली आहे. या विभागात २८.९५ लाख हेक्टर क्षेत्रावर, म्हणजे सरासरीच्या ९२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. ठाणे विभागात सर्वांत कमी पेरणी झाली असून, तेथे १ लाख ५४ हजार ६७४ हेक्टर क्षेत्रावर, म्हणजे अवघी ३९ टक्के पेरणी झाली आहे. मराठवाड्यात पेरणीचे प्रमाण ८६ टक्के, तर विदर्भात ८१ टक्के नोंदविण्यात आले आहे. राज्यात १ जून ते २८ जुलै या कालावधीत सरासरी ४८०.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हे प्रमाण अपेक्षित सरासरीच्या ९४.८५ टक्के आहे. कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची तूट कायम आहे. कोकण विभागात सर्वाधिक १,८१५.०१ मिलिमीटर, म्हणजे सरासरीच्या १११ टक्के पाऊस झाला आहे. विदर्भात सर्वांत कमी ३७४.६ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या ७३ टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे. तर पुणे विभागात ८७, नाशिक ८३, संभाजीनगर ७७ टक्के पाऊस झाला आहे

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! वर्षभरापूर्वी बांधलेला पूल पुरात तुटला,उमरा–मेट मार्ग बंद; पुरामुळे वाहतूक ठप्प
01:10
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील तिरु नदीला पूर; पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका
00:24
Video thumbnail
जळकोटला मुसळधार पावसाने झोडपले; पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
02:00
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! थोड्याशा पावसात रस्ता खचला, कार थेट खड्ड्यात
02:08
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पावसाचा जोर कायम; नदीकाठच्या गावांना अलर्ट!
01:10
Video thumbnail
Latur|लातूरचा 'आंबेडकर चौक' की तळं? थोड्याशा पावसातच रस्ता जलमय!
02:54
Video thumbnail
Latur|अखेर पाऊस धावून आला; वाळणाऱ्या पिकांना मिळालं जीवदान!
02:28
Video thumbnail
Nanded|किनवट-माहूरमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा यलो अलर्ट
00:41
Video thumbnail
Nanded|पुलावरून पाणी, तीन गावांचा संपर्क तुटला; नागरिकांचे हाल!
00:35
Video thumbnail
Nanded|अखेर सहस्रकुंड धबधबा प्रवाहित! निसर्गप्रेमींसाठी पर्वणी
00:38
Video thumbnail
Latur|लातूर हादरलं!उड्डाण पुलावरून थेट खाली कोसळले दोन तरुण
02:39
Video thumbnail
Nanded|किनवट हादरलं! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा १२ तासांनंतरही शोध नाही
01:16
Video thumbnail
Latur|एसटी आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक; काळ्या फिती लावून आंदोलन!
01:17
Video thumbnail
Latur|पहिल्याच पावसात मनपाची पोलखोल; नालीचे घाण पाणी थेट रस्त्यावर!
02:22
Video thumbnail
Latur|पाणीपुरवठ्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही – जिल्हाधिकारी
03:01

Latest news