लोकशाही दिनाला जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य करा

लातूर : प्रतिनिधी
सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी व समस्या जलदगतीने व न्याय्य पद्धतीने सोडविण्यासाठी शासनाने सुरू केलेला लोकशाही दिन हा महत्त्वाचा उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांनी स्वत: उपस्थित राहावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनिल मंदाडे यांनी केली आहे.
नागरिक विविध शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार पाठपुरावा करूनही कामे मार्गी लागत नसल्याने अखेर लोकशाही दिनामध्ये अर्ज सादर करतात. मात्र, अनेकदा जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त स्वत: उपस्थित राहत नसून त्यांच्या प्रतिनिधींमार्फत सुनावणी घेतली जाते. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींवर अपेक्षित निर्णय होत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. तसेच, संबंधित विभागप्रमुखही अनेकदा अनुपस्थित राहत असल्याने तक्रारींचे तातडीने निराकरण होत नाही. परिणामी, लोकशाही दिनाच्या मूळ उद्देशालाच बाधा पोहोचत असून हा उपक्रम केवळ औपचारिकता ठरत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय, लोकशाही दिनात अर्ज स्वीकारल्यानंतर अनेकदा अर्जदारांना टोकन क्रमांक किंवा पोहोच पावती दिली जात नसल्याने अर्जाच्या पुढील कार्यवाहीबाबत संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक अर्जाला टोकन क्रमांक व पोहोच पावती देणे बंधनकारक करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनिल मंदाडे यांनी जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांनी लोकशाही दिनाच्या दिवशी स्वत: उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकाव्यात, संबंधित विभागप्रमुखांची उपस्थिती अनिवार्य करावी तसेच अर्ज स्वीकारताना टोकन व पोहोच पावती देण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली आहे. लोकशाही दिन हा प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणारा लोकाभिमुख उपक्रम असून, त्याचे गांभीर्य आणि प्रभाव कायम राखण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांची प्रत्यक्ष उपस्थिती अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14

Latest news