कॉंग्रेसने व्यक्त केली चिंता, मोदी म्हणतात, परदेश प्रवास टाळा
मॉस्को : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडीओ शेअर करत देशाचा आर्थिक विकास दर ७.८ टक्क्यांवर गेल्याचा दावा केला. परंतु कॉंग्रेसने या दाव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, केंद्र सरकारचा हा दावा खोटा आहे. केवळ आकड्यांचा फुगवटा करून जीडीपीत सुधारणा दाखविली जात असल्याचे कांग्रेसने म्हटले आहे. दरम्यान, एकीकडे जीडीपी वाढलेला दाखवितानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात केवळ फिरण्यासाठी जाणे टाळावे, लग्न समारंभासाठीही परदेशाऐवजी भारताला प्राधान्य द्यावे, ‘मेड इन इंडिया’चा मंत्र प्रत्यक्ष जीवनात अंगीकारावा, असे आवाहन देशवासीयांना केले. यामुळेही आर्थिक विकास दराच्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
भारताने नोंदवलेल्या ७.८ टक्के आर्थिक विकासदराबद्दल देशवासीयांचे अभिनंदन. भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी स्वदेशीचा मंत्र स्वीकारणे आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. नागरिकांनी अनावश्यक खरेदी टाळावी आणि ‘गरज नसेल तर सोने खरेदी करू नका असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. आत्मनिर्भर भारत बनणे अत्यंत आवश्यक आहे. स्वदेशीचा मंत्र आणि ‘लोकल फॉर व्होकल’चा विचार स्वीकारला पाहिजे, असे मोदी म्हणाले.
भारताच्या आर्थिक प्रगतीला आणखी वेग देण्यासाठी आत्मनिर्भरता महत्त्वाची आहे. नागरिकांनी स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन देशात तयार होणा-या वस्तूंना प्राधान्य द्यावे. गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी टाळून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणा-या सवयी अंगीकारण्याची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. परदेशात लग्न करण्याऐवजी भारतातच लग्नसमारंभ आयोजित करण्याला प्रोत्साहन द्यावे. देशात मोठ्या प्रमाणावर होणा-या लग्नसमारंभांमुळे पर्यटन, हॉटेल, केटरिंग, कापड, दागिने यांसह विविध व्यवसायांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी शक्य तितका खर्च देशातच करण्याची सवय लावून घ्यावी, असा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिला.
लोकल फॉर व्होकल
मंत्र जपायला हवा
आत्मनिर्भर भारत बनणे अत्यंत आवश्यक आहे. स्वदेशीचा मंत्र आणि ‘लोकल फॉर व्होकल’चा विचार स्वीकारला पाहिजे. ‘मेड इन इंडिया’चा मंत्र प्रत्यक्ष जीवनात अंगीकारण्याची गरज असल्याचे मोदींनी सांगितले. भारताच्या आर्थिक प्रगतीला आणखी वेग देण्यासाठी आत्मनिर्भरता महत्त्वाची आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
















