22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीययेत्या ५ वर्षांत २ कोटी घरे, ३०० युनिट मोफत वीज

येत्या ५ वर्षांत २ कोटी घरे, ३०० युनिट मोफत वीज

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पादरम्यान मोठी घोषणा केली. त्या म्हणाल्या की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आतापर्यंत तीन कोटी घरे बांधण्यात आली असून पुढील ५ वर्षांत आणखी २ कोटी घरे बांधली जातील.

याशिवाय त्या म्हणाल्या की, प्रधानमंत्री सूर्योदय योजनेंतर्गत एक कोटी घरांमध्ये सोलर पॅनलचे वाटप केले जाईल आणि ३०० युनिट मोफत वीज दिली जाईल.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आमचे सरकार सर्व लक्ष्य पूर्ण करत आहे. त्या म्हणाल्या की, एक कोटी लखपती दीदी तयार झाल्या असून आता त्या वाढून ३ कोटी झाल्या आहेत. ९ कोटी महिला ८३ लाख बचत गटांमध्ये सामील झाल्या आहेत. आयुष्मान भारत योजनेंतर्गत आरोग्य कवच सर्व आशा आणि अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांना देण्यात येईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, पुढील पाच वर्षे आर्थिक वाढीची वर्षे असतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR