बोरी : जिंतूर तालुक्यातील गणपुर येथील मीरा राजेंद्र वजीर (वय २३) या महिलेचा स्वत:च्या शेतामध्ये पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार गणपुर येथील मीरा वजीर ही महिला आपल्या शेतामध्ये विहिरीतील पाणी आणण्यासाठी गेली असता पाय घसरून विहीरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना २१ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी मुलीचे वडील तानाजी शिंपले यांचे फिर्यादीवरून बोरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद २२ फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे. मीरा वजीर यांच्यावर २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता गणपुर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पती, मुलगी, सासू असा परिवार आहे. या घटनेमुळे गणपुर येथे हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा तपास सपोनि. सरला गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय काळे, पांडुरंग तुपसंदर करण्यात येत आहे.