पुणे : राज्यातील वातावरणात अनेक बदल दोन दिवस दिसणार आहेत. काही ठिकाणी उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील देखील तापमान ४० अंशाच्यावर जाणार आहे. त्याचवेळी अवकाळी पावसाचा अंदाज आहे. यामुळे राज्यात ऊन-पावसाचा खेळ काही भागात दिसणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील शेतक-यांसमोर पुन्हा संकट निर्माण झाले आहे. राज्यातील नागरिक एकीकडे उन्हामुळे लाही लाही होणार आहेत. त्याचवेळी राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी आज आणि उद्या अवकाळी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. पुढील ४८ तासांमध्ये मराठवाडा, विदर्भात ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी पावसाचा फटका शनिवारी पिकांना बसला. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आला आहे.
राज्यातील वातावरणात अनेक बदल दोन दिवस दिसणार आहेत. काही ठिकाणी उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील देखील तापमान ४० अंशाच्या वर जाणार आहे. त्याचवेळी अवकाळी पावसाचा अंदाज आहे. यामुळे राज्यात ऊन-पावसाचा खेळ काही भागांत दिसणार आहे. त्याचा फटका रबी हंगामातील पिकांना बसणार आहे.
अमरावतीत अवकाळी पावसाचा फटका
अमरावती विभागात शुक्रवारी रात्री विजेच्या गडगडाटात अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे गहू, संत्रा, कांद्यासह भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे अमरावतीत नागरिकांची आणि शेतक-यांची तारांबळ उडाली. शहराच्या अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. अवेळी होत असलेल्या पावसामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात पाऊस
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला. बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसराला अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. शेतातील काढून ठेवलेले पीक पावसामुळे खराब होण्याची नामुष्की शेतक-यांवर ओढवली. एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी नाही तर दुसरीकडे अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा, आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळिराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात पाऊस
बुलढाणा जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी पाऊस झाला. जिल्ह्यातील लोणार, सिंदखेड राजा, मेहकर, साखर खेर्डा परिसरात अचानक वादळी वा-यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे या परिसरातील भाजीपाला पिकांसह ज्वारी, गहू, हरभरा तसेच कांदा बियाणे पिकांचे मोठे नुकसान झाले. साखर खेर्डा परिसरात गारांचाही पाऊस झाल्याने आंबा पिकाचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. तर साखर खेर्डा परिसरातही वादळी वा-यामुळे सवडत येथील घरावरील पत्रे उडाले. अनेक घरांची पडझड झाली आहे.