वलांडी : प्रतिनिधी
भाल्की तालुक्यातील अळवाई गावामध्ये आठ वर्षीय रूद्रप्रताप पांडुरंग कोटमाळे या लहान मूलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सूमारास घडली.
रूद्रप्रताप पांडूरंग कोटमाळे व त्यांचे वडील व आजी-आजोबा हे सर्व शेतात कामासाठी गेले असता वादळी वाऱ्यासह मध्यम पावसास सुरूवात झाली व शेतात बसलेल्या रूद्रप्रताप वरती वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाल्याने अळवाई गावात शोककळा पसरली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.