21.4 C
Latur
Monday, October 21, 2024
Homeक्रीडान्यूझिलंडचा भारतावर विजय

न्यूझिलंडचा भारतावर विजय

बंगळुरू : वृत्तसंस्था
न्यूझिलंड क्रिकेट टीमने टॉम लॅथमच्या नेतृत्वात इतिहास रचला आहे. न्यूझिलंडने भारत दौ-यातील कसोटी मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. न्यूझिलंडने बंगळुरूतील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर ८ विकेट्सनी विजय मिळवला आहे.

टीम इंडियाने न्यूझिलंडला विजयासाठी १०७ धावांचे आव्हान दिले होते. न्यूझिलंडने हे आव्हान २७.४ ओव्हरमध्ये २ विकेट्स गमावून पूर्ण केले. न्यूझिलंडने या विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली तसेच ३६ वर्षांची प्रतीक्षा संपवली. न्यूझिलंडचा हा भारतातील तिसरा आणि १९८८ नंतरचा पहिला विजय ठरला.

रचीन रवींद्र हा न्यूझिलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. रचीनने पहिल्या आणि दुस-­या डावात निर्णायक खेळी करत न्यूझिलंडच्या विजयाचा पाया रचला. रचीनने दुस-या डावात नाबाद ३९ धावा केल्या. तर पहिल्या डावात टीम साऊथीसोबत आठव्या विकेटसाठी १३७ धावांची गेमचेंजिंग पार्टनरशीप केली. या भागीदारीमुळे ख-या अर्थाने सामना न्यूझिलंडच्या बाजूने झुकला. रचीनने पहिल्या डावात शतकी खेळी केली. रचीनचे हे भारतातील पहिले तर कसोटी कारकीर्दीतील दुसरे शतक ठरले. रचीनने पहिल्या डावात १५७ बॉलमध्ये १३४ धावा केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR