बीजिंग : भारत आणि चीन यांनी एकमेकांचे प्रतिस्पर्धी न बनता एकमेकांचे व्यापारातील भागीदार बनले पाहिजे, तसेच धोका नाही तर संधी म्हणून विचार केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना ते असे देखील म्हटले आहेत की, भारत आणि चीन हे दोन्ही देश एकमेकांचे महत्त्वपूर्ण शेजारी देश आहेत. दोन्ही देश ग्लोबल साऊथचे सदस्य असून, दोन्ही देशांचे खोलवर सांस्कृतिक संबंध आणि व्यापक अशा स्वरुपाचे सामायिक हितसंबंध आहेत. चीनेचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारत आणि चीनमधील सुधारत असलेल्या संबंधांबाबत मोठे विधान केले आहे. ते बीजिंगमध्ये आयोजित १४ व्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या अधिवेशनादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे, भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा फटका केवळ अमेरिका, इस्त्रायल आणि इराण या देशांनाच बसत नाहीयेत, तर जगभरातील अनेक देशांना या युद्धाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फटका बसत आहे. या युद्धाच्या तडाख्यामधून भारत, चीन सारखे देश देखील सुटले नाहीये. जर युद्ध आणखी काही दिवस सुरूच राहिले तर इंधन टंचाई निर्माण होण्याची भीती सतावत आहे. दरम्यान एकीकडे युद्ध सुरू आहे तर दुसरीकडे आता चीनमधून मोठी बातमी समोर आली आहे.
शिन्हुआ न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना भारत चीन संबंधांवर बोलताना चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी मोठं विधान केलं आहे. भारत आणि चीनच्या संबंधांवर बोलताना त्यांनी म्हटले की भारत आणि चीन हे एक महत्त्वाचे शेजारी देश आहेत. दोन्ही देशांमध्ये खोलवर सांस्कृतिक संबंध आणि व्यापक अशा स्वरुपाचे सामायिक हितसंबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये असलेला परस्पर विश्वास, भागीदारी हे एकमेकांच्या विकासासाठी पुरक असल्याचं यावेळी वांग यी यांनी म्हटले आहे. मात्र दोन्ही देशांमधील संघर्ष आणि प्रतिस्पर्धा ही आशिया खडांच्या विकासावर प्रतिकूल परिणाम घडवून आणू शकते असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
गेल्या वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट झाली होती. या भेटीमुळे आता भारत आणि चीनचे संबंध आणखी मजबूत झाले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची अनेक विषयांवर चर्चा झाली. दोन्ही देशांदरम्यान असलेल्या व्यापाराने आता एक नवी उंची गाठली आहे असेही यावेळी चीनने म्हटले आहे.

