22 C
Latur
Tuesday, May 27, 2025
Homeसोलापूरसमस्या दूर न झाल्यास महापालिकेवर घागर मोर्चा आणणार : तौफिक शेख पैलवान

समस्या दूर न झाल्यास महापालिकेवर घागर मोर्चा आणणार : तौफिक शेख पैलवान

सोलापूर : नई जिंदगी परिसरातील समस्या दूर न झाल्यास महापालिकेवर घागर मोर्चा काढण्याचा ईशारा अजित पवार गटाचे नेते तौफीक शेख यांनी दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की नई जिंदगी प्रभाग २१ परिसरातील सर्व नगरांमध्ये सोलापूर महानगरपालिका मार्फत होणारा पाणीपुरवठा दर आठ दिवसाला एकदा व कमी दाबाने येत आहे तसेच प्रभाग क्रमांक २१ मध्ये गेल्या दोन महिन्यापासून पिण्याचे पाणी अवेळी येत असून पाण्याचा दबाव देखील कमी असतो व तसेच अनियमितपणे पाणीपुरवठा होत असून विशेष म्हणजे पाणी हा जिव्हाळ्याचा विषय असताना देखील प्रभागातील नागरिकांना याचे खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.

त्यातच प्रभागातील महिला भगिनींना यांना त्याचे नाहक त्रास सोसावी लागत असून सर्वसामान्य नागरिक हे महापालिकेला नियमित कर आकारणी करत असताना देखील महापालिकेमार्फत नागरिकांना मिळणा-या सुविधा म्हणजेच नियमित पाणीपुरवठा, प्रभागातील स्वच्छता, रस्त्यावरील पथदिवे, तुंबलेले ड्रेनेज लाईन व गटारी साफ करणे” अशा कामे पूर्ण होत नाही दरम्यान सदरील समस्या गांभीर्य पूर्ण विचार करून लवकरात लवकर सोडवण्यात यावे अशा आशयाचे निवेदन अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांना देण्यात आले असून लवकरच सदरील समस्या दूर न झाल्यास नई जिंदगी ते सोलापूर महानगरपालिका असे घागर मोर्चा आणणार असा इशारा माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी दिली यावेळी प्रभागातील नागरिक व जमातीचे लोकांची प्रामुख्याने उपस्थिती होती..

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR