मुंबई : आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी सर्वच संघ सज्ज आहे. टीम इंडिया इंग्लंड दौ-यानंतर आशिया कप स्पर्धेनिमित्ताने मैदानात उतरणार आहे. तर इतर संघ टी २० मालिका खेळून या स्पर्धेत उतरणार आहेत.
आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना हा ९ सप्टेंबरला होणार आहे. यूएईकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. या स्पर्धेसाठीची तयारी अखेरच्या टप्प्यात आहे. ही अशी लगबग सुरु असताना भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या एका खेळाडूने मोठी घोषणा केली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूने संघ बदलणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हा खेळाडू आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये नव्या टीमकडून खेळताना दिसू शकतो. या खेळाडूने आपल्या क्रिकेट असोसिएशनकडे दुस-या संघासोबत खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागितलं आहे.
नियमांनुसार, दुस-या संघाकडून खेळण्यासाठी पहिल्या संघाकडून एनओसी घेणे बंधनकारक असते. विशेष म्हणजे या खेळाडूने गेल्या वर्षीही टीम बदलण्याची घोषणा केली होती. हनुमा विहारी देशांतर्गत क्रिकेटमध्ये नव्या संघाकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. हनुमा आंध्र क्रिकेट असोसिएशनसाठी खेळत होता. हनुमाने एसीएकडे एनओसीची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हनुमा आता त्रिपुराकडून खेळू शकतो. हनुमानला त्रिपुराच्या नेतृत्वाची जबाबदारीही मिळू शकते.
हनुमान विहारी याने काय म्हटले?
मी बदलाबाबत विचार करत आहे. त्रिपुराकडून मला खेळण्याबाबत विचारणा करण्यात आली असे हनुमानने क्रिकबझसोबत बोलताना म्हटले. तसेच हुनमाने एनओसीसाठी अर्ज केला असल्याचेही सांगितले.