18.4 C
Latur
Friday, December 5, 2025
Homeनिवडणूकलातूर शहर महापालिका प्रभाग क्रमांक-१ - नागरिकांनी मनमोकळेपणाने मांडल्या समस्या

लातूर शहर महापालिका प्रभाग क्रमांक-१ – नागरिकांनी मनमोकळेपणाने मांडल्या समस्या

गटार साफ, घाण उचलणार कोणे? समस्यांसह जगावं लागतय; घर सोडून तर जाता येत नाही!

लातूर : (प्रतिनिधी) गेली सात वर्षे लातूर शहर महानगरपालिकेत प्रशासक आहे़ या प्रशासकीय काळात लातूर शहरातील रस्ते, पाणी, वीज यासह इतर  प्रश्न, समस्यांची पुर्तता होत नाही, अशी जवळपास सर्वांचीच ओरड आहे़ ‘एकमत’ने जनसामान्यांचा आवाज मनपा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी स्पॉट रिपोर्टच्या माध्यमातून प्रयत्न सुरु केला आहे़ शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांनी आपल्या व्यथा, वेदना, समस्या या व्यासपीठावर मनमोकळेपणाने मांडल्या आहेत़ प्रभाग क्रमांक १ मध्ये रस्ते, नाल्या, कचºयाची मोठी समस्या आहे़ एका ज्येष्ठ महिलेने तर समस्यांसह जगावं लागतय, घर सोडून तर जाता येत नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया दिली.

या ना त्या कारणाने लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका लांबत गेल्या़ तब्बल सात वर्षे महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत़ प्रशासकीय राज असल्याने मनपातील उच्च पदस्थ अधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी मनपाचा कारभार हाकत आहेत़ त्यात जनसामान्यांचा आवाज बदला गेल्याची भावना नागरिकांची झाली आहे़ प्रभाग क्रमांक १ मध्ये व्यंकटेशनगर, बेळंबेनगर, काळीगल्ली, सूळगल्ली, नांदगाव वेस, पटेल चौक, रामगल्ली, मिस्कीनपूरा, सिद्धेश्वर वेस, लाडगल्ली, माळेगल्ली हा भाग येतो.

शहराच्या गाव भागातील प्रभाग क्रमांक १़ या प्रभागाचा बहूताश भाग स्लम एरियामध्ये मोडतो़ या प्रभागात नळाला पाणी येत़ परंतु, सुरुवातीचे पाच, दहा मिनीटे पाण्याना उग्र दर्प असतो़ त्यानंतर स्वच्छ पाणी येते़ मनपाच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी चार-आठ दिवसाला येतात़ गटारीतील कचरा काढतात़ परंतू, काढलेला कचरा चार-चार दिवस उचलत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरते़ गटारीतील दुर्गंधी रस्त्यावर पडून राहाते़ सखल भाग तर आहेच पण गटारी लहान असल्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यांवर कायम असते़ परिणामी या भागात सतत दलदल असते़ या मुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

मनपाचे अधिकारी, कर्मचारी यांचा मनमानी कारभार चालला आहे़ सुविधांअभावी या प्रभागातील नागरिक त्रस्त आहेत़ या प्रभागातील नाल्या साफ होतात परंतू, डोकेदुखी असते ती नालीतून काढून रस्त्यावर टाकलेली घाण उचलली जात नाही़ गाव भागातील विशेष: प्रभाग क्रमांक १ मधील गटारी लहान आहेत़ हा भाग जुना असल्यामुळे दाटीवाटीचा आहे़ रस्ते मोठे नाहीत त्यामुळेही अनेक प्रश्न आहेत़ या प्रभागात स्वच्छतेचा जसा प्रश्न आहे त्यापेक्षा मोठा प्रश्न बेरोजगारीचा आहे.

युवकांच्या हाताला काम देण्यासाठी काही करता आले तर ते निश्चितपणे करावे, असे कार्तिक मगर म्हणाले़ नगरसेवक काम करणारा असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली़ मनपाचे कर्मचारी उद्दट बोलतात, असे इसाक कुरेशी यांचे म्हणणे आहे तर एका ज्येष्ठ नागरिकाने कचरा उचलणाºया यंत्रणेचा कंत्राटदार प्रायव्हेट आहे, असे कर्मचारी सांगतात, अशी तक्रार केली़ एकंदरीत प्रभाग क्रमांक १ मध्ये रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता, आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR