15.6 C
Latur
Monday, December 8, 2025
Homeनिवडणूकलातूर शहर महापालिका प्रभाग क्रमांक-४ – मनपा यंत्रणेनेच केले ग्रीन बेल्टचे कचरा बेल्ट

लातूर शहर महापालिका प्रभाग क्रमांक-४ – मनपा यंत्रणेनेच केले ग्रीन बेल्टचे कचरा बेल्ट

मोकळ्या जागेचा गैरवापर, नागरिक त्रस्त

लातूर (प्रतिनिधी ) : शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये समस्याच समस्या आहेत़ या प्रभागात एकमेव असलेल्या ग्रीन बेल्टचा लातूर शहर महानगरपालिका घन कचरा व्यवस्थापनच्या यंत्रणेने कचरा बेल्ट करुन टाकला आहे़ त्यामुळे नागरिकांना मॉर्निग वॉकसाठी श्री विलासराव देशमुख पार्क(नाना-नानी पार्क) किंवा थेट रिंग रोडवर जावे लागते़ कचरा, गटारींची स्वच्छता, गटारीतून काढलेला कचरा न उचलणे आदी समस्याही मोठ्या प्रमाणात असल्याचे या प्रभागातील नागरिकांनी ‘एकमत’च्या विशेष कार्यक्रमात सांगीतले.

प्रभाग क्रमांक ४ मध्ये आनंदनगर, संजयनगर, इंद्राळेनगर, इस्लामपूरा, न्यु़ काझी मोहल्ला हा भाग येतो़ आनंंदनगरमध्ये बहुतांश ठिकाणी गटारी व रस्त्यांची कामे झालेली आहेत़ परंतु, गटारी सतत तुंबलेल्या असतात़ त्यामुळे गटारीतील घाण पाणी रस्त्याने वाहत असते़ सर्वात महत्वाचे म्हणजे, पोलीस वसाहतीत आता एक-दोनच पोलीस राहात आहेत़ पुर्ण वसाहत मोडकळीस आलेली आहे़ या वसाहतीच्या बाजूच्या ग्रीन बेल्टमध्ये या भागातील कचरा जमा केला जातो़ कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला की, तो मोठ्या गाड्यांनी कचरा डेपोला रवाना केला जातो़ घंटागाडीवाल्यांनी ग्रीन बेल्टमध्ये मिनी कचरा डेपो केल्याने या भागात मोकाट श्वान आणि डुकरांचा वावर वाढला आहे़ कचºयामुळे डासांचे प्रमाण वाढले़ आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे पोलीस वसाहतीत कोणीच राहात नाही़ संपूर्ण वसाहतीची जागा मोकळी आहे़ या जागेत टूकार तरुण रात्री ते मध्यरात्रीपर्यंत बसलेले असतात़ दारु पिणे, गांजा ओढणे, अवैध धंदे सुुरु असतात़ गुंडगिरी सुरु आहे़ मोकळ्या जागेचा गैर वापर होतो आहे़ त्याचा या परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे़ मोडकळीस आलेली पोलीस वसाहत पाडून तिथे नवीन वसाहत निर्माण केली तरच या भागातील कचºयाचा प्रश्न सूटेल आणि मोकळ्या जागेचा गैरवापरही थांबेल, असे राजकुमार चिथाडे यांचे म्हणणे आहे.

संजयनगरमध्येही कचºयाची समस्या आहे़ इस्लामपुरामधील नाल्याची अडचण असल्याचे विशाल भोरे म्हणाले़ इंदिरानगरकडून आलेल्या या नाल्याच्या पाण्यात कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, घाण इस्लामपुºयात येते़ पावसाळ्यात या नाल्याचे पाणी थेड घरांत शिरते़ घरात गुडघाबर पाणी साचते़ त्यामुळे रात्र-रात्र जागुन काढण्याची वेळ येते़ सुमारे १०० घरांची ही मोठी अडचण आहे़ नगरसेवक नसल्याने तर अधिकच अडचणीत भर पडली़ महानगरपालिका प्रशासनाने आमची घरे पाडून त्या ठिकाणी मुरुम टाकून उंचावर आमची घरे बांधून द्यावीत, अशी अपेक्षा विशाल भोरे यांनी व्यक्त केली.

इंद्राळेनगर, अंजलीनगरमधील आसिफ जाफर शेख म्हणाले, गटारी साफ केल्या जातात़ गटारीतील घाण काढून गटारीच्या कडेला टाकली जाते़ परंतु, ती घाण चार, पाच दिवस उचलली जात नाही़ परिणामी संपूर्ण परिसरात दुर्गंधी सुटलेली असते़ सुरैया पठाण म्हणाल्या, नालीच्या मधोमध विजेचे एक खांब आहे़ इंदिरानगरकडून आलेली घाण, कचरा पुढे न जाता या खांबामुळे अडतो़ दुर्गंधी सुटते़ हा खांब काढावा, असे त्यांचे म्हणणे आहे़ सिकंदर शेख यांनी सांगीतले की, नळाला येणारे पाणी अपुरे असते़ एका वर्षापासून बोअर बंद अवस्थेत आहे़ मनपा प्रशासनाला सांगुनही बोअरची दुरुस्ती झाली नाही़ परिणामी या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR