रस्ते, पाणी, पथदिव्यांची व्यवस्था नव्याने विकसीत करण्याची गरज, गटारीतील घाण उचलणार नसाल तर गटारीच काढू नका!
लातूर (प्रतिनिधी ) : शहरातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये गेल्या सात वर्षांत लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने या प्रभागाकडे लक्षच दिले नाही़ त्यामुळे रस्ते, गटारी, पथदिवे, पिण्याचे पाणी, आरोग्याच्या सुविधा या सर्वच गोष्टी पुन्हा नव्याने विकसीत करण्याची गरज आहे़ महत्वाचे म्हणजे महापालिकेचे कर्मचारी गटारी साफ करता़ गटारीतील घाण गटारीच्या कडेवर टाकता आणि ती उचलतच नाही़ त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असून गटारीतील घाण उचलणार नसाल तर गटारीच काढू नका, असे या प्रभागातील नागरिकांचे म्हणणे आहे.
प्रभाग क्रमांक ५ मध्ये मंठाळेनगर, डालडा फॅक्टरी, श्री शिवाजी हायस्कुल, मोचीगल्ली, बादाडेनगर, गौसपूरा हा भाग येतो़ मंठाळेनगरमध्ये सिमेंटचे रस्ते आहेत़ परंतु, या रस्त्यांची आता दुरवस्था झालेली आहे़ काही ठिकाणी खड्डे पडले आहेत तर काही ठिकाणी सिमेंट कॉक्रीट उखडून सळ्या बाहेर आल्या आहेत़ घंटागाडी नियमित येत नसल्यामुळे कचºयाची अडचण होत आहे़ महानगरपालिकेच्या शाळेच्या पाठीमागील रस्त्यावर कचरा साचला असल्याने तिथे मोकाट श्वान व डूकरांचा वावर आहे़ गौसपूरामध्ये माने टायरपासुन ते रिंगरोडपर्यंच्या मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत़ या रोडवर स्कॅ्रप मार्केट असल्यामुळे हेवी लोडेड वाहनांची सतत वर्दळ असते.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते़ या रोडची दुरुस्ती होणे आवश्यक आहे़ तसेच गौसपूरा गल्लीनंबर ५ मध्ये विजेचे खांब सिमेंटचे आहेत़ विजेच्या तारा खुप खालपर्यंत लोबत आहेत़ विजेच्या तारा ओडून घेणे आवश्यक आहे़ सम्राट चौक ते गणपती चौक ते रिंग रोड या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने रस्ता लहान झाला आहे़ या रस्त्यावरील अतिक्रम काढणे आवश्यक आहे़ बादाडेनगरमधील ग्रीन बेल्टची दुरावस्था झाली आहे़ ग्रीन बेल्टमध्ये गवत, काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत़ कंपाऊंड वॉलच्या लोखंडी जाळ्या गायब आहेत.
















