34.8 C
Latur
Tuesday, June 10, 2025
Homeमहाराष्ट्रमोदी सरकार उत्सवात आणि इकडे लोक रेल्वेतून पडून मेली

मोदी सरकार उत्सवात आणि इकडे लोक रेल्वेतून पडून मेली

मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले

मुंबई : दोन लोकल रेल्वे क्रॉस होत असताना धक्का लागून भयंकर घटना मुंब्रा रेल्वे स्थानकानजीक घडली. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी मोदी सरकारवर बरसले. मोदी सरकार सेवेचा आनंदोत्सव करत असताना देशातील सत्य परिस्थिती मुंबईतून येत आहे. लोक रेल्वेतून पडून मेले आहेत.

मुंब्रा रेल्वे स्थानकावरील घटनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरले. राहुल गांधी म्हणाले मोदी सरकार ११ वर्षातील सेवेचा उत्सव साजरा करत असताना देशातील परिस्थिती मुंबईतून येत असलेल्या दु:खद घटनेमध्ये दिसत आहे. रेल्वेमधून पडून अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.

मोदी सरकारचा ११ वर्षे फक्त प्रचार
भारतीय रेल्वे कोट्यवधी जिवांचा कणा आहे. पण, आज असुरक्षा, गर्दी आणि विस्कळीतपणाचे प्रतीक बनली आहे. मोदी सरकारचे ११ वर्षे ना उत्तरदायित्व आणि ना बदल, फक्त प्रचार अशी आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. सरकारने २०२५ बद्दल बोलणे सोडून दिले आहे, आता २०४७ ची स्वप्न विकत आहे. मी मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करतो आणि जखमींची प्रकृती लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना करतो असे राहुल गांधी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR