मुल्लानपूर : मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वात आयपीएल २०२५ च्या क्वालिफायर २ मध्ये धडक दिली आहे. मुंबईने रंगतदार झालेल्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवला आहे. मुंबईने यासह क्वालिफायर २ चे तिकीट मिळवले आहे. मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी २२९ रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र मुंबईच्या गोलंदाजांसमोर गुजरातला २० ओव्हरमध्ये ६ विकेट्स गमावून २०८ रन्सच करता आल्या.
मुंबई इंडियन्सने २२८ धावा करत विजयासाठी २२९ धावांचे आव्हान दिले होते. शेवटच्या १२ चेंडूत ३६ धावांची गरज होती. पण बोल्टने हे षटक जबरदस्त टाकले आणि शेवटच्या षटकात २४ धावा ठेवल्या. गुजरात टायटन्सला शेवटच्या षटकात फक्त ४ धावा करता आल्या. यासह मुंबई इंडियन्सने गुजरातचा २० धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई इंडियन्सने क्वॉलिफायर २ फेरीत एन्ट्री मारली आहे. क्वॉॅलिफायर पंजाब किंग्सशी लढत होणार आहे. या सामन्यात विजयी संघ अंतिम फेरीत आरसीबी दोन-दोन हात करणार आहे.