30.9 C
Latur
Tuesday, June 3, 2025
Homeक्रीडामुंबईकडून पंजाबला २०४ धावांचे आव्हान

मुंबईकडून पंजाबला २०४ धावांचे आव्हान

अहमदाबाद : मुंबई इंडियन्सने २० षटकात ६ गडी गमवून २०३ धावा केल्या असून पंजाब किंग्ससमोर विजयासाठी २०४ धावांचे आव्हान आहे. आता हे आव्हान पंजाब गाठते की मुंबई डिफेंड करते हे महत्त्वाचं आहे. या सामन्यात विजयी संघ अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी लढणार आहे.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी ४४-४४ धावांची खेळी केली. जॉनी बेअरस्टोने ३८ धावा केल्या. पंजाबकडून अझमतुल्लाह उमरझाईने २ विकेट्स घेतल्या. काइल जेमिसन, मार्कस स्टॉयनिस, विजयकुमार वैशाख आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR