27 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeराष्ट्रीयनेहरूंनी लोकशाही वाचवली : मल्लिकार्जुन खर्गे

नेहरूंनी लोकशाही वाचवली : मल्लिकार्जुन खर्गे

इंदूर : पाच राज्यात निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आपापल्या प्रचाराला गती देत ​​आहेत. सर्व प्रमुख पक्षांचे प्रमुख नेते आणि स्टार प्रचारक पुढील काही दिवस या ५ राज्यात आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचार करणार आहेत. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे मंगळवारी मध्य प्रदेशाच्या दौऱ्यावर होते. येथे त्यांनी जनतेला संबोधित केले. ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष नेहमीच गरिबांच्या पाठीशी राहिला आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी या देशातील लोकशाही वाचवली, पण तुम्ही (भाजप) काय केले? काँग्रेसकडून तुम्हाला अजूनही खूप काही शिकायचे आहे. काँग्रेसने जे काही केले ते देशासाठी आणि जनतेसाठी केले, असे ते म्हणाले.

तसेच मध्य प्रदेश निवडणुकीत समाजवादी पक्षाला जागा न दिल्याने अखिलेश यादव काँग्रेसवर हल्लबोल करत आहेत. इंडिया आघाडीचा महत्त्वाचा भागीदार असल्याने त्यांची भाषा पक्षाला आश्चर्यचकित करणारी आहे आणि त्यामुळेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे लवकरच अखिलेश यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR