जुन्या गाड्यांसाठी ई १० पेट्रोल पुन्हा सुरू करा

नवी दिल्ली : देशात ई २० पेट्रोलवरून सुरू असलेल्या वादाच्या आणि जुन्या वाहनांच्या मालकांकडून होणा-या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) व्ही. अनंत नागेश्वरन यांनी एक महत्त्वाचा सल्­ला दिला आहे. जुन्या दुचाकी वाहनांसाठी ई १० पेट्रोल पुन्हा उपलब्ध करून देण्यात यावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉलचे प्रमाण वाढवण्यापूर्वी अन्नसुरक्षा, पाण्याचा वापर आणि शेतीवर होणारा परिणाम या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.

एका विशेष लेखात मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन आणि आर्थिक व्यवहार विभागाचे सल्लागार आकाश पूजारी यांनी इंधनातील इथेनॉल प्रमाणावर आपले मत स्­पष्­ट केले आहे. केवळ जुन्या वाहनांवर ई २० पेट्रोलचा काय परिणाम होतो, एवढाच हा प्रश्न मर्यादित नसून; भविष्यात इथेनॉल निर्मितीसाठी आपल्याला किती जमीन आणि पाणी वापरावे लागेल, तसेच अन्नधान्य पिकांवर त्याचा काय परिणाम होईल, याचा सखोल विचार करणे आवश्यक असल्­याचेही त्­यांनी स्­पष्­ट केले आहे. तसेच भविष्यात ई २७ किंवा ई ३० इंधन आणण्याच्या चर्चेवर इशारा देताना त्यांनी स्पष्ट केले की, काही धोरणात्मक निर्णय सहज बदलता येतात, परंतु पिकांच्या पद्धती आणि इंधनासाठी जमीन-पाण्याचे नियोजन एकदा निश्चित झाले की ते बदलणे कठीण जाते.

… तर इंधन हे अन्नाची जागा घेऊ लागेल
इथेनॉलचे मिश्रण जितके जास्त, तितकी त्यासाठीच्या कच्च्या मालाची मागणी जास्त. भारत सध्या उस, मका, तांदूळ आणि इतर धान्यांपासून इथेनॉलची निर्मिती करतो. इथेनॉलची मागणी वाढल्याने डिस्टिलरीज (दारू/इथेनॉल कारखाने) धान्य आणि उसाचे मोठे खरेदीदार बनत आहेत. मुख्य आर्थिक सल्लागारांच्या मते, यामुळे अर्थव्यवस्थेत एक मूलभूत अडचण निर्माण होते. शिवाय, मका हा पोल्ट्री आणि पशुखाद्याचा महत्त्वाचा घटक असल्याने त्याचा थेट परिणाम अन्नधान्य अर्थव्यवस्थेवर आणि महागाईवर होऊ शकतो.

उसाचा वापर कमी होणार
उसाच्या बाबतीत हा परिणाम आधीच दिसू लागला आहे. चालू हंगामात एकूण साखरेच्या उत्पन्नापैकी तब्बल १० टक्के (सुमारे ३० लाख टन) साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवण्यात आली होती. उसाचा वापर कमी झाल्यास इथेनॉल निर्मितीचा सर्व ताण मका व इतर धान्यांवर पडेल, असेही त्­यांनी स्­पष्­ट केले आहे.

पाण्याचा गंभीर प्रश्न
इथेनॉल धोरणाचा संबंध थेट पाण्याशीही जोडलेला आहे. विशेषत: ऊस हे जास्त पाणी लागणारे पीक आहे. एकदा जमिनीचे आणि पाण्याचे नियोजन इंधन निर्मितीसाठी निश्चित झाले आणि त्यावर आधारित उद्योग उभारले गेले, की त्यातून माघार घेणे अत्यंत कठीण आणि त्रासदायक ठरते. ऊर्जा सुरक्षेचे फायदे मिळवताना अर्थव्यवस्थेच्या इतर घटकांना त्याची छुपी किंमत मोजावी लागत नाही ना, याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे आवाहनही व्ही. अनंत नागेश्वरन यांनी केले आहे.

जुन्या वाहनांसाठी ई १० पेट्रोलचा पर्याय का हवा?
भारतात सध्या बीएस ४ मानकांआधीच्या आणि कार्बोरेटर असलेल्या सुमारे ७.५ ते ८ कोटी जुन्या दुचाकी गाड्या रस्त्यावर धावत आहेत. चाचण्यांनुसार ई २० मुळे इंजिनचे मोठे नुकसान होत नसल्याचे सिद्ध झाले असले, तरी कार्बोरेटर असलेल्या वाहनांची रचना वेगळी असते. कार्बोरेटर हे ई २० मधील अतिरिक्त ऑक्सिजनचे प्रमाण ओळखू शकत नाही. यामुळे इंजिनमध्ये हवेच्या प्रमाणात इंधन कमी जाऊन इंजिन जास्त तापण्याची शक्यता असते. तसेच, जुन्या गाड्यांमधील रबराचे भाग इथेनॉलचा प्रभाव सहन करू शकत नाहीत. या जुन्या वाहनांसाठी ई २० सोबत ई १० पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देणे योग्य ठरेल. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळेल आणि इथेनॉलचा एकूण वापरही नियंत्रणात राहील, अशी अपेक्षाही त्­यांनी व्­यक्­त केली आहे.

केंद्र सरकारची भूमिका काय?
सध्या ई २० हेच सरकारचे अधिकृत धोरण आहे. विविध चाचण्यांनंतर सरकारने ई २० चे समर्थन केले असून, सध्या २० टक्क्यांपेक्षा जास्त एथेनॉल मिश्रणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पेट्रोलचे वितरण करणे वाहतूक आणि वितरणाच्या दृष्टीने खर्चिक असल्याचे सांगत देशभरात वेगवेगळ्या इंधनांचे पर्याय देण्याची मागणी सरकारने फेटाळली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news