38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeराष्ट्रीयसहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे निधन

सहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे निधन

मुंबई : सहारा ग्रुपचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती सुब्रत रॉय यांचे मंगळवारी निधन झाले. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ७५ वर्षांचे होते. सहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रत रॉय दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्यांचे पार्थिव लखनौमधील सहारा शहरात आणले जाईल, जिथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. सुब्रत रॉय यांचा जन्म १० जून १९४८ रोजी झाला. ते भारतातील आघाडीचे व्यापारी आणि सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक होते. त्यांना देशभरात ‘सहाराश्री’ म्हणूनही ओळखले जात होते.

जामिनावर बाहेर होते सुब्रत रॉय
अनेक वर्षांपासून लोकांचे पैसे न दिल्याने सहारा इंडियाविरुद्ध पाटणा उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. लोकांनी हे पैसे कंपनीच्या अनेक योजनांमध्ये गुंतवले होते. मात्र नंतर याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून सहाराश्रींना मोठा दिलासा मिळाला. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने पाटणा उच्च न्यायालयाच्या अटकेच्या आदेशावर तात्काळ सुनावणी करून स्थगिती दिली होती. तसेच, त्याच्यावर पुढील कारवाईबाबत स्थिती कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

गोरखपूर शहराशी घट्ट नाते
सुब्रत रॉय यांचे गोरखपूरशी घट्ट नाते होते. त्यांनी गोरखपूरमधून आपल्या फायनान्स कंपनीच्या व्यवसायाला अवघ्या 2000 रुपयांपासून सुरूवात केली होती. सुब्रत रॉय यांनी त्यांचे मित्र एसके नाथ यांच्यासोबत १९७८ मध्ये फायनान्स कंपनी सुरू केली. त्यांनी आपल्या कंपनीचा व्यवसाय त्यांनी 2 लाख कोटींवर नेला होता.

सिनेमा रोडवरील ऑफिस रूममध्ये दोन खुर्च्या आणि एक स्कूटर घेऊन त्यांनी 2 लाख कोटी रुपयांचा प्रवास केला. जिथे तो छोट्या दुकानदारांकडून बचत करून घेत असे. माझ्याकडे थोडेफार भांडवल असताना मी १९७८ साली औद्योगिक परिसरात कपड्यांचा आणि पंख्यांचा छोटा कारखाना सुरू केला. यावेळी तो स्कूटरवरून पंखे व इतर वस्तू विकायचा. दुकानात पंखे पोहोचवण्यासोबतच ते दुकानदारांना अल्पबचतीची जाणीव करून देत असत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR