33.2 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeराष्ट्रीयबस आणि कारची जोरदार धडक; ४ युवकांचा मृत्यू

बस आणि कारची जोरदार धडक; ४ युवकांचा मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील बामनवास परिसरात सोमवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला. रोडवेज बस आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि मोठी गर्दी झाली. परिस्थिती पाहून रोडवेज चालकाने तेथून पळ काढला. त्यानंतर संतप्त जमावाने तेथे एकच गोंधळ घातला. परिस्थिती पाहून स्थानिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर अतिरिक्त पोलिस बंदोबस्तही मागवण्यात आला.

स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दौसा डेपोची रोडवेज बस जयपूरहून गंगापूरच्या दिशेने येत होती. खेडली आणि नागरहेरा गावातील सहा तरुण पिपलाईहून जयपूरच्या दिशेने कारमधून जात होते. यादरम्यान रोडवेज आणि कारची जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. या अपघातात कारमधून प्रवास करणारा तरुण गंभीर जखमी झाला. अपघात होताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR