नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत लवकरच अत्याधुनिक क-रळअफ गुप्तचर विमाने असणा-या देशांच्या पंक्तीत सामिल होणार आहे. सुमारे १०,००० कोटींच्या या संरक्षण प्रकल्पाला जूनच्या चौथ्या आठवड्यात होणा-या उच्चस्तरीय बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवाई दलासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
या हाय-टेक २४१५ी्र’’ंल्लूी ं्र१ू१ां३ मध्ये विकसित स्वदेशी तंत्रज्ञान वापरले जाणार असून, शत्रूच्या हालचालींवर हवेतून अचूक लक्ष ठेवण्याची क्षमता भारतीय सैन्याला प्राप्त होणार आहे. अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलसारख्या देशांकडे अशी विमाने आहेत. आता भारतही त्या पंक्तीत सामिल होणार आहे.
या प्रकल्पाची धुरा डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या हाती आहे. तीन विमानांची खरेदी खुल्या निविदेद्वारे करण्यात येणार असून, बोईंग आणि बॉम्बार्डियर यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची विमाने या प्रक्रियेसाठी विचाराधीन आहेत.
परंतु, या विमानांमध्ये बसवले जाणारी सर्व गुप्तचर, सर्व्हेलन्स आणि लक्ष्यीकरण यंत्रणा या पूर्णत: स्वदेशी असतील. ऊफऊडच्या सेंटर फॉर एअरबोर्न सिस्टिम्सने या प्रणालींचा विकास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. आता त्या निवडलेल्या विमानांवर बसवून क-रळअफ मानकांनुसार रूपांतर करण्याचे काम केले जाणार आहे.
ही विमाने भारतीय हवाई दलाला अत्यंत प्रगत अशी हवाई ते जमिनीवरील माहिती संकलन क्षमता देतील. ज्यामुळे शत्रूच्या रडार, हवाई संरक्षण प्रणाली आणि हालचाल करणा-या युनिट्सवर अचूक हल्ले शक्य होतील. या प्रणालींमुळे वास्तविक वेळेतील, बहुपरिमिती निरीक्षण करून शत्रूच्या हालचाली ट्रॅक करता येणार आहेत. त्यामुळे युद्ध किंवा सर्जिकल स्ट्राईकसारख्या मोहिमांमध्ये अचूक व वेळेवर निर्णय घेता येतील. ही प्रणाली गुप्त, दुर्बोध आणि तात्काळ धोके ओळखण्यात व त्यांच्याशी सामना करण्यात मदत करेल.