35.9 C
Latur
Saturday, March 14, 2026
Homeराष्ट्रीयबैलाने सुरक्षा रक्षकांना पळविले

बैलाने सुरक्षा रक्षकांना पळविले

बेगुसरायमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सुरक्षेत चुक

बेगुसराय : बेगुसरायमध्ये मुख्यमंत्री नितीश यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे दिसून आले. समृद्धी यात्रेअंतर्गत मुख्यमंत्री थोड्याच वेळात ज्या हेलिपॅडवर उतरणार आहेत, तिथे एक बैल घुसला. बैलने तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांना पळवून लावले.

स्वत:ला वाचवण्यासाठी एक पोलिस कर्मचारी अग्निशमन दलाच्या गाडीवर चढला. यामुळे तिथे गोंधळ निर्माण झाला. थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर येथे उतरणार होते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या तिस-या टप्प्यातील समृद्धी यात्रेचा आज शेवटचा दिवस होता. मुख्यमंत्री आज बेगुसराय आणि नंतर शेखपूरला जाणार होते. यावेळी ते दोन्ही जिल्ह्यांमध्ये सुमारे ६३० कोटी रुपयांच्या विविध योजनांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार होते.

मुख्यमंत्री नितीश सर्वात आधी बेगुसरायला पोहोचतील आणि कारखान्यांचे निरीक्षण केले. त्यानंतर अधिका-यांसोबत विकास योजनांचा आढावा घेतला. येथून ते शेखपुराला गेले. दुपारी सुमारे ३ वाजता पटनाला परत आले. मुख्यमंत्री येथे एकूण ३३० कोटी रुपयांच्या ४०२ योजनांपैकी ११८.६७ कोटी रुपयांच्या १९० प्रकल्पांचे शिलान्यास केला, तर २११.९७ कोटी रुपयांच्या २१२ प्रकल्पांचे उद्घाटनही त्यांनी केले.