शिमला : हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षा आणि मंडी लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार प्रतिभा सिंह यांनी म्हटले आहे की ईव्हीएमएध्ये छेडछाड झाली नसेल तर लोकसभा निवडणुकीचे निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध लागतील आणि देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा दावा सिंह यांनी केला.
राज्यातील चारही लोकसभा आणि सहा विधानसभा निवडणुकांचे निकालही काँग्रेसच्या बाजूने लागतील, असे त्यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ४०० पार करण्याचा नारा फसला असून भाजपला २०० चा आकडाही पार करता येणार नाही, असे ही त्या म्हणाल्या.
भाजपने निवडणुकत जनतेच्या मुद्द्यांवर चर्चा केली नाही. वाढती महागाई, बेरोजगारी यावर पूर्णपणे मौन बाळगले. राज्यातील जनतेने काँग्रेसच्या बाजूने प्रचंड मतदान केले आहे, यामुळे ४ जूनला जाहीर होणारा निवडणुकीचा निकाल पूर्णपणे काँग्रेसच्या बाजूने लागेल, असे ही प्रतिभा सिंह म्हणाल्या.