पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोनही गट एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे ते बोलत होते. ते म्हणाले दोनही गट एकत्र येण्याबाबत केवळ माध्यमामध्ये चर्चा सुरू आहे. आम्ही पक्ष बांधणीचे काम करीत आहे.
पक्षाचा वर्धापनदिन मंगळवारी सकाळी साजरा करण्यात येणार आहे असे नमूद करुन ते म्हणाले की या कार्यक्रमास राज्यातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा आहे असे सांगून ते म्हणाले की, आले तर नक्कीच बरोबर घेऊ.पण याबाबत मला नेमकी माहिती नाही. आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार आहे असे त्यांनी सांगितले.