29.9 C
Latur
Monday, April 7, 2025
Homeसोलापूरचैत्री यात्रेसाठी चंद्रभागा नदीपात्रात सोडले पाणी

चैत्री यात्रेसाठी चंद्रभागा नदीपात्रात सोडले पाणी

वारकरी, भाविकांना चंद्रभागा नदीत करता येणार पवित्र स्रान

पंढरपूर : प्रतिनिधी
चैत्र शुध्द एकादशी मंगळवार दि. ८ एप्रिल रोजी असून दि. २ ते १२ एप्रिल या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. वारक-यांसाठी चंद्रभागेचे स्रान फार पवित्र मानले जाते. श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेण्यापुर्वी भाविक चंद्रभागा स्रान करतात. तसेच चैत्र महिन्यात कावडी स्रानासाठी देखील कावडी घेऊन मोठ्या प्रमाणात भाविक येतात. मात्र काही दिवसांपासून चंद्रभागा नदी कोरडी पडली होती. याकडे प्रशासनाचे माध्यमांनी लक्ष वेधून घेतल्यानंतर भाविकांना चंद्रभागा नदी पात्रात पवित्र स्रान करता यावे यासाठी दगडी पूलाजवळील नगरपरिषदेच्या बंधा-यातून २५० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.

चंद्रभागा नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे व जास्त काळ पाणी साठून राहिल्याने पाण्यावर शेवाळे आणि घाण साचली होती. नदीपात्रातील शेवाळे व घाण पाणी वाहून जावे यासाठी पिराच्या कुरोली आणि गुरसाळे येथील बंधा-यातून दगडी पूला शेजारी असलेल्या बंधा-यात पाणी घेऊन ते पाणी चंद्रभागा नदीपात्रात सोडण्यात आले.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी कार्यकारी अभियंता भीमा पाटबंधारे विभाग व पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून नगर परिषदेच्या बंधा-यामधून चंद्रभागा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात आले. नगर परिषदेच्या बंधा-यामधून भाविकांच्या सोयीसाठी चंद्रभागा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आल्याने व चैत्री यात्रेमध्ये भाविकांना स्रानासाठी पाणी उपलब्ध झाल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR