23 C
Latur
Friday, August 1, 2025
Homeमुख्य बातम्याभारत-ब्रिटन ‘फ्री ट्रेड’मुळे सामान्य ग्राहकांना मिळणार दिलासा

भारत-ब्रिटन ‘फ्री ट्रेड’मुळे सामान्य ग्राहकांना मिळणार दिलासा

रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार; गॅझेट, दागिने स्वस्त होतील; लक्झरी कार, बाईक, धातूंच्या किंमती वाढणार

लंडन : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या ब्रिटन दौ-यावर आहेत. या दौ-यादरम्यान भारत आणि यूके या दोघांमध्ये एक ऐतिहासिक करार होणार आहे, तो म्हणजे भारत-यूके फ्री ट्रेड अ‍ॅग्रीमेंट. या कराराला भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने आधीच मान्यता दिली आहे आणि आता ब्रिटनमध्ये पंतप्रधान मोदींच्या स्वाक्षरीने तो औपचारिक होणार आहे. या मुक्त व्यापार कराराचा परिणाम केवळ कंपन्या किंवा व्यावसायिकांपुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावरही होईल. अनेक गोष्टी स्वस्त होऊ शकतात, तर काही वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

या वस्तू होऊ शकतात स्वस्त : मोबाईल, लॅपटॉप आणि गॅझेट्स. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरील कर कमी झाल्यामुळे या वस्तू स्वस्त होऊ शकतात. तसेच शूज, कपडे आणि फॅशन उत्पादने. आता यावर शून्य कर असेल किंवा खूप कमी कर असेल, ज्यामुळे बाजारात त्यांच्या किमती कमी होऊ शकतात. याचसोबत दागिने देखील स्वस्त होतील. यूकेमधून येणा-या दागिन्यांवरील कस्टम ड्युटीमध्ये कपात केल्याने त्यांच्या किमतीही कमी होऊ शकतात. चामड्याचे जॅकेट, बॅग्ज आणि यासारख्या वस्तू आता परवडणा-या किमतीत मिळू शकतात.

औषधांवर संमिश्र परिणाम : भारत आणि ब्रिटनमध्ये औषधांचा व्यापार दुतर्फा आहे. भारत ब्रिटनला औषधे निर्यात करतो आणि तेथून काही औषधं आयातही करतो. त्यामुळे, एफटीए नंतर काही औषधांच्या किमती कमी होऊ शकतात, परंतु काही प्रकरणांमध्ये ती महाग देखील होऊ शकतात. याचा थेट परिणाम दोन्ही देश कोणत्या औषधावरील किती शुल्क कमी करतात यावर होईल.

या गोष्टी महागण्याची शक्यता : उच्च दर्जाच्या कार आणि बाईक या यूकेमधून येणा-या लक्झरी वाहनांना तुलनेने कमी कर सवलत मिळू शकते आणि त्यामुळे त्यांच्या किमती वाढू शकतात. तसेच धातू आणि स्टील उत्पादनांच्या किंमती वाढतील. भारत आता यूकेमधून उच्च दर्जाच्या धातूला देशांतर्गत बाजारात प्रवेश देऊ शकेल, ज्यामुळे देशांतर्गत उद्योगांवर दबाव येईल आणि किमती वाढू शकतात.

कृषी उत्पादनांवर दिलासा नाही : या करारातून सध्या तरी भात आणि गहू यासारख्या कृषी उत्पादनांना थेट दिलासा मिळणार नाही. देशांतर्गत शेतक-यांचे नुकसान होऊ नये म्हणून भारत सरकारने या क्षेत्रातील दर कमी करण्याचे टाळले आहे. बेरोजगारी कमी करण्यासाठी हा करार उपयुक्त ठरू शकतो. या ट्रेड डीलमुळे भारतीय उत्पादन, कापड, सागरी आणि दागिने क्षेत्रांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. यूकेच्या मोठ्या बाजारपेठेत सहज प्रवेश मिळाल्यास भारताची निर्यात वाढू शकते, ज्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होतील

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR